पिंपरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत अडकलेल्या कामगार, प्रवासी तसेच बेघर व्यक्तींसाठी आळंदी नगरपरिषदेने निवारा केंद्राची सोय केली आहे. या केंद्रातील रहिवाशांना सर्वसाधारण आरोग्य तपासणीनंतर नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे हस्ते औषध, पाणी या साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कर निरीक्षक रामराव खरात, आरोग्य विभाग प्रमुख शीतल जाधव, संघपाल गायकवाड, दत्तात्रय सोनटक्के, अरुण घुंडरे उपस्थित होते. नीलेश महाराज लोंढे यांचे हस्ते अन्नधान्याच्या ट्रकची पूजा करून ट्रक रवाना करण्यात आले. या वेळी नगरसेवक संदीप रासकर, संजय घुंडरे, किरण येळवंडे, आकाश जोशी, अशोक उमरगेकर उपस्थित होते. निवारा केंद्रात सुमारे दोनशे गरजू वास्तव्यास आहे. यामध्ये भिक्षेकरी, अनाथ आणि बेघर, तसेच हातावर पोट असलेल्यांचा समावेश आहे.
गरजूंच्या निवाऱ्याची सोय
करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत अडकलेल्या कामगार, प्रवासी तसेच बेघर व्यक्तींसाठी आळंदी नगरपरिषदेने निवारा केंद्राची सोय केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Apr 2020, 4:00 am