नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. दुधड येथील शेतकरी गोपाळराव सटवाजी सूर्यवंशी (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. १४ सप्टेंबर रोजी राहत्या घरी विजेच्या धक्क्याने मरण पावले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ४ मुली, जावई,नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर १५ सप्टेंबर रोजी दुपारी दुधडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
हिमायतनगर तालुक्यातील दुधड येथील एका शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Sep 2019, 4:00 am