नांदेड : रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नायगाव तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी माधव सुभान गायकवाड (वय ६०) हा शेतकरी २२ नोव्हेंबर रोजी शेताकडे गेला असता रानडुकराच्या कळपाने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नांदेडच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नरसी वन विभागाचे परिमंडळ अधिकारी एस. एस. गेडाम यांनी रुग्णालयात जाऊन गायकवाड यांची भेट घेतली होती. त्यासोबतच त्यांच्या नातेवाईकांकडून मदतीचा अर्ज स्वीकारला.
रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2019, 4:00 am