अ‍ॅपशहर

सव्वा लाख शेतकरी खुश! बँक खात्यात जमा झाली एवढी रक्कम

करोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या कामाकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष असल्याने कर्जमाफीचा लाभ देण्याची कामे प्रलंबित होती. आता पुन्हा ही कामे सुरू करण्यात आली आहेत. कर्जमाफी योजनेच्या लाभाबाबत चार हजार ६५२ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2020, 2:05 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजने’चा लाभ देण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने पुन्हा सुरू केली आहे. आतापर्यंत सव्वा लाख शेतकऱ्यांना सुमारे ९२७ कोटी ३० लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून, ही रक्कम त्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सव्वा लाख शेतकरी खुश! बँक खात्यात जमा झाली एवढी रक्कम


करोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या कामाकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष असल्याने कर्जमाफीचा लाभ देण्याची कामे प्रलंबित होती. आता पुन्हा ही कामे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील कर्जखाती एक लाख ५२ हजार २८९ आहेत. या खात्यांपैकी आधार प्रमाणीकरण झालेली खाती एक लाख ३८ हजार ९४९ आहेत. आतापर्यंत एक लाख २५ हजार ९३५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर सुमारे ९२७ कोटी ३० लाख रुपये जमा करण्यात आले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शेतकरी कर्जमाफीत घुसले बोगस लाभार्थी; सरकार 'अशी' घडवणार अद्दल

कर्जमाफी योजनेच्या लाभाबाबत चार हजार ६५२ शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. या तक्रारींपैकी दोन हजार ६५२ शेतकऱ्यांच्या तक्रारींचे जिल्हास्तरीय समितीकडून निवारण करण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालय स्तरावर आतापर्यंत ३९३ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. अद्याप एक हजार १९३ तक्रारी या तहसीलदार कार्यालय स्तरावर प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज