कन्नडः तालुक्यातील आठेगाव येथील सुदर्शन पांडुरंग वाळुंजे (वय ३२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील राहत्या घरी आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. वाळुंजे यांची आठेगाव शिवारात गट क्रमांक ५७मध्ये चार एकर शेतजमीन असून, तेथे ते वास्तव्यास होते. पत्नी सकाळी शेतात कापूस वेचणीसाठी गेली असता घरातील लोखंडी अँगलला जोत्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर बाब सकाळी दहा वाजता शेजारील शेतकरी कडूबा वाळुंजे हे घराजवळून जात असताना उघडकीस आली. गेल्या काही दिवसांपासून सततचा दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.
शेतकऱ्याची आत्महत्या
कन्नडः तालुक्यातील आठेगाव येथील सुदर्शन पांडुरंग वाळुंजे (वय ३२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील राहत्या घरी आत्महत्या केली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Nov 2019, 4:00 am