परतीच्या पावसामुळे कृषी, महसूल विभाग हतबल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी आणि महसूल विभागाला अपयश आले आहे. वेल्हा आणि मावळ तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमधील पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी आणि महसूल विभाग एकत्रितपणे पंचनामे करत असतात. त्यामध्ये कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी आदी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. विमाधारक शेतकऱ्यांची नावे विमा कंपनीला कळविण्यात येतात. विमा कंपन्यांचे प्रतिनिधीही पंचनाम्याच्या ठिकाणी सहभागी होतात. मात्र, जिल्ह्यात खरीपाच्या पिकांची काढणी झाल्यानंतरही पंचनामे होऊ शकले नसल्याने संबंधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
वेल्हे तालुक्यातील लाशिरगाव येथील २.९९ हेक्टर क्षेत्रावरील दहा भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये भात आणि भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे. भाताच्या ५७.१६ हेक्टर आणि भुईमुगाच्या ०.४० हेक्टर अशा ५७.५६ हेक्टर क्षेत्रावरील विमाधारक १५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात पिकाच्या १८९.४६ हेक्टर क्षेत्रावरील ८२५ बिगर विमाधारक शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या दोन तालुक्यांचे अहवाल मिळाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
विमा कंपन्यांचे हात वर
विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून लाभ मिळत असल्याने पंचनामे करताना कृषी विभागाकडून विमाधारक शेतकरी वगळण्यात येतात. विमा कंपन्यांनीही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे कळविलेली नाहीत. कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनामे न झाल्याने आणि विमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. संबंधित शेतकऱ्यांची यादी तयार केली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात कृषी आणि महसूल विभागाला अपयश आले आहे. वेल्हा आणि मावळ तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमधील पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर कृषी आयुक्तालयाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी आणि महसूल विभाग एकत्रितपणे पंचनामे करत असतात. त्यामध्ये कृषी सहायक, ग्रामसेवक, तलाठी आदी अधिकाऱ्यांचा समावेश असतो. विमाधारक शेतकऱ्यांची नावे विमा कंपनीला कळविण्यात येतात. विमा कंपन्यांचे प्रतिनिधीही पंचनाम्याच्या ठिकाणी सहभागी होतात. मात्र, जिल्ह्यात खरीपाच्या पिकांची काढणी झाल्यानंतरही पंचनामे होऊ शकले नसल्याने संबंधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
वेल्हे तालुक्यातील लाशिरगाव येथील २.९९ हेक्टर क्षेत्रावरील दहा भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मावळ तालुक्यातील विविध गावांमध्ये भात आणि भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे. भाताच्या ५७.१६ हेक्टर आणि भुईमुगाच्या ०.४० हेक्टर अशा ५७.५६ हेक्टर क्षेत्रावरील विमाधारक १५० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. भात पिकाच्या १८९.४६ हेक्टर क्षेत्रावरील ८२५ बिगर विमाधारक शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या दोन तालुक्यांचे अहवाल मिळाले असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
विमा कंपन्यांचे हात वर
विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून लाभ मिळत असल्याने पंचनामे करताना कृषी विभागाकडून विमाधारक शेतकरी वगळण्यात येतात. विमा कंपन्यांनीही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नावे कळविलेली नाहीत. कृषी आणि महसूल विभागाकडून पंचनामे न झाल्याने आणि विमा कंपन्यांकडूनही नुकसान भरपाई मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. संबंधित शेतकऱ्यांची यादी तयार केली जाणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.