अ‍ॅपशहर

संपूर्ण कर्जमाफी हवीच

संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय ठराव होऊ देणार नाही, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.

Maharashtra Times 24 Jul 2017, 3:00 am
आमदार बच्चू कडू यांचा आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farmers loan waiver demand will place in state assembly says mla bacchu kadu
संपूर्ण कर्जमाफी हवीच


म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘ऐतिहासिक कर्जमाफीसाठी विधिमंडळात अभिनंदनाचा ठराव सत्ताधाऱ्यांकडून मांडला जाणार असल्याचे समजते. परंतु, संपूर्ण कर्जमाफी झाल्याशिवाय ठराव होऊ देणार नाही,’ असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. ठरावावर मतदान घेण्याची मागणी केली जाईल. तसेच हा ठराव फेटाळून लावत त्याचे रूपांतर संपूर्ण कर्जमाफीच्या ठरावात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांना ध्वजवंदनापासून रोखूनही त्यांनी जबरदस्तीने तिरंगा फडकविल्यास त्यांच्या घरात घुसून आंदोलन केले जाईल,’ असा इशारा देण्यास कडू विसरले नाहीत. पालकमंत्र्याऐवजी सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांऐवजी ग्रामसेवक, जिल्हाधिकाऱ्यांनी ध्वजवंदन करण्याचा आग्रह धरण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनात कर्जमाफीचा ठराव विरोधक मांडणार असल्याची शक्यता आहे. परंतु, समितीतर्फे संपूर्ण कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या मागणीचा स्वतंत्र ठराव आमदार जयंत पाटील आणि आमदार बच्चू कडू मांडणार आहेत. त्याचा संदर्भ देत आमदार पाटील म्हणाले, ‘अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून संपूर्ण कर्जमाफीसाठी लढणार आहोत. ’

‘समितीमध्ये मतभेद नाहीत’

रघुनाथदादा पाटील यांनी स्वाभिमानी संघटनेवर टीका केली होती. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी सुकाणू समितीपासून दूर राहणेच पसंत केले. ‘समितीच्या बैठकांमध्ये विविध मुद्यांवर वाद-विवाद होतात. मात्र, मतभेद झाले तरी समिती एकसंध आहेे,’ असे आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सुकाणू समिती एकसंध असल्याचे सांगण्यात आले तरीही राजू शेट्टी यांची अनुपस्थिती जाणवत होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज