अ‍ॅपशहर

ज्वारी, बाजरीचे पीक मराठवाड्यात इतिहासजमा

दुष्काळी मराठवाड्यात पाण्याची नेहमीच अडचण असली तरी शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नगदी पिकांकडे वळाला आहे. गेल्या २० वर्षांत मराठवाड्यात कापूस लागवडीची स्थिती 'जैसे थे' असली तरी सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ३६ टक्यांनी वाढले आहे.

रामचंद्र वायभट | Maharashtra Times 21 May 2018, 4:19 am
औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम farming


दुष्काळी मराठवाड्यात पाण्याची नेहमीच अडचण असली तरी शेतकरी गेल्या काही वर्षांपासून नगदी पिकांकडे वळाला आहे. गेल्या २० वर्षांत मराठवाड्यात कापूस लागवडीची स्थिती 'जैसे थे' असली तरी सोयाबीनचे क्षेत्र तब्बल ३६ टक्यांनी वाढले आहे.

मराठवाड्यात ८० टक्यांपेक्षा अधिक क्षेत्र कोरडवाहू असून, दहा टक्के भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो. विभागाच्या खात्रीशीर पाऊस पडणाऱ्या भागातही दोन ते तीन वेळेस 'ड्राय स्पेल' येतात. पावसाचे आगमन आणि समाप्ती यामध्ये झालेले बदलामुळे पिकांच्या उत्पादनात घट येत असल्याचे चित्र मराठवाड्यात आहे. उत्पादनाची खात्री नसल्यामुळे शेतीपूरक जोडधंदे; तसेच प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमांसह शेतकऱ्यांनी पीक पद्धतीतही मोठ्या प्रमाणावर बदल केले असल्याचे चित्र आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या २० वर्षांमध्ये बहुतांश कोरडवाहू शेतीक्षेत्रातून किफायतशीर उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी कापसाला पसंती दिली असली, तरी सोयाबीनसारखे पिकांच्या लागवडक्षेत्रात ३६ टक्के वाढ झाली आहे, मका पिकाचे लागवडीचे क्षेत्र 'जैसे थे' असले, तरी ज्वारी, बाजरी या पिकांच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या १२ वर्षांमध्ये मराठवाड्यात सरासरी ७०९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ९१ टक्के पाऊस पडला असून, गेल्या ७ वर्षांच्या तुलनेमध्ये तब्‍बल सहा वर्षे मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज