म. टा. प्रतिनिधी, लातूर
प्लॉट नावावर करीत नसल्याने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न उच्चशिक्षित मुलाने केला. या दुर्दैवी घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून आई गंभीर आहे. पोलिसांनी मुलास अटक केली असून शनिवारी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. साधुराम यशवंत कोटंबे असे मृताचे नाव आहे. ज्ञानदीप कोटंबे असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.
मोरेनगर भागात ज्ञानदीप राहतो. याच भागात रोडलगत एक मोठा प्लॉट आहे. येथील प्लॉट नावावर करावा अशी मागणी तो आई-वडिलांकडे करत होता. या दरम्यान त्याने आई-वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. निवृत्त शिक्षक असलेले वडील साधुराम व आई गयाबाई यांना विश्वासात घेऊन त्याने नारळपाणी पिण्यास दिले. त्यामध्ये विषारी द्रव्य मिसळले होते. साधुराम ते प्यायले. शंका आल्याने गयाबाईंनी ते अर्धवट ठेवले. ते पाणी प्यायल्यानंतर साधुराम यांचा मृत्यू झाला तर, गयाबाईंवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रारंभी येथे आकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला; पण फिर्यादी गयाबाईंच्या माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास केला. त्यात ज्ञानदीपने विष पाजल्याचे निष्पन्न झाले. ज्ञानदीपविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घवले तपास करीत आहेत.
प्लॉट नावावर करीत नसल्याने आई-वडिलांना नारळ पाण्यातून विष देऊन ठार करण्याचा प्रयत्न उच्चशिक्षित मुलाने केला. या दुर्दैवी घटनेत वडिलांचा मृत्यू झाला असून आई गंभीर आहे. पोलिसांनी मुलास अटक केली असून शनिवारी न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. साधुराम यशवंत कोटंबे असे मृताचे नाव आहे. ज्ञानदीप कोटंबे असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे.
मोरेनगर भागात ज्ञानदीप राहतो. याच भागात रोडलगत एक मोठा प्लॉट आहे. येथील प्लॉट नावावर करावा अशी मागणी तो आई-वडिलांकडे करत होता. या दरम्यान त्याने आई-वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. निवृत्त शिक्षक असलेले वडील साधुराम व आई गयाबाई यांना विश्वासात घेऊन त्याने नारळपाणी पिण्यास दिले. त्यामध्ये विषारी द्रव्य मिसळले होते. साधुराम ते प्यायले. शंका आल्याने गयाबाईंनी ते अर्धवट ठेवले. ते पाणी प्यायल्यानंतर साधुराम यांचा मृत्यू झाला तर, गयाबाईंवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हा गुन्हा शिवाजीनगर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. प्रारंभी येथे आकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला; पण फिर्यादी गयाबाईंच्या माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास केला. त्यात ज्ञानदीपने विष पाजल्याचे निष्पन्न झाले. ज्ञानदीपविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक गोवर्धन भुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक घवले तपास करीत आहेत.