म. टा. प्रतिनिधी, पुणे
भारतीतील महिलांच्या सद्यस्थितीचे खरे आणि स्पष्ट चित्र समोर यावे, या उद्देशाने दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्राने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला. यासाठी केलेल्या सर्वेक्षणात देशातील महिलांचे शिक्षण, आरोग्य, रोजगार या मुद्द्यांवर भर दिला आहे. यासाठी देशातील सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमधील ७४ हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला आहे. अहवालातील निष्कर्षांचा घेतलेला हा आढावा...
उच्च शिक्षणात मुलींची गळती
- महिलांमध्ये साक्षरतेचे प्रमाण वाढते आहे
- पण उच्च शिक्षणात गळतीचे प्रमाण जास्त
- कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी ही शिक्षण सोडण्याची प्रमुख कारणे
- ७२ टक्के मुली सहशिक्षण घेतात, तर २७ टक्के मुली महिला कॉलेजमध्ये शिकतात
- ४२ टक्के मुलींना आर्थिक समस्या
- ४४ टक्के मुलींना पालक, कुटुंब, शिक्षकांकडून उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन
- १६ टक्के मुली घरापासून दूर वसतिगृहात राहून उच्च शिक्षण घेतात
- उच्च शिक्षण घेणाऱ्या ४२ टक्के मुली एनसीसी, एनएसएस, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रांत सहभागी होत नाहीत
- ३२ टक्के मुलींना पुढील शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
- २६ टक्के मुली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचऱ्यांच्या शोषणाला बळी पडल्या आहेत
- १० टक्के मुलींना त्यांची संस्था सुरक्षित वाटत नाही
कुटुंबातील महिला
- महिलांमध्ये विवाह करण्याचे वय वाढते आहे
- शहरी झोपडपट्टीतील महिला १७ टक्के महिला कुटुंबाच्या खर्चाचे निर्णय़ घेतात.
- केवळ १६ टक्के महिला बचतीविषयी निर्णय़ घेतात.
- उच्च शिक्षण घेणाऱ्या ७३ टक्के मुलींना कौटुंबिक आणि नेतृत्वात समान संधी
- २८ टक्के महिलांना कुटुंबातील सदस्यांचे दडपण वाटते
- ६४ टक्के महिलांना घरगुती कामासाठी सक्ती
- १८ टक्के महिलांना आर्थिक साह्यासाठी कुटुंबातून दबाव
- आदिवासी कुटुंबात ५१ टक्के कुटुंबांत हुंडा पद्धती नाही
- शहरातील वस्तीतील ८९ टक्के महिला म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत नवऱ्याबरोबरच राहायचे
अध्यात्मिक क्षेत्रात महिलांची संख्या वाढते आहे
भारताला समृद्ध आध्यात्मिक वारसा लाभला आहे. यात महिलांचा सहभाग जास्त आहे. गेल्या काही वर्षांत महिलांचा सहभाग वाढतो आहे; कारण...
- आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या महिला २५ वर्षांखालील अधिक आहेत.
- ३५ टक्के महिलांचे प्रेरणास्थान त्यांचे आध्यात्मिक गुरू आहेत.
- ६९ टक्के महिला त्यांच्या क्षेत्रातील आवडीमुळे येथे आल्या.
- आर्थिक कारण आणि कुटुंबाची इच्छा म्हणूनही आध्यात्म स्वीकारले
- बहुतांश महिला त्यांच्या वैयक्तिक खर्चासाठी गुरू, भक्त आणि संस्थेवर अवलंबून
- आध्यात्मामध्ये आनंद, मनःशांती आणि आत्मविश्वास आहे, असे ८७ टक्के महिलांना वाटते
लिंग निकषांचा परिणाम
लिंगभेद हा कोणत्याही देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील मोठा अडथळा ठरतो. तो भारतालाही लागू आहे. या महिलांप्रती असलेल्या दुय्यम दर्जाच्या भावनेमुळे महिलांवर अनेक बंधने घालण्यात आली आहेत.
- बहुतेक सर्व राज्यांत आधिवासी महिलांची तस्करी दिसते. अनेक ठिकाणी पालकच मुलींना विकतात.
- मुलांना असुरक्षित वाटण्याचे छेडछाड हे मुख्य कारण आहे.
- पश्चिम बंगालमधील ३६ टक्के महिलांना गावातही सुरक्षित वाटत नाही. भीती एवढी आहे, की ९० टक्के महिला संध्याकाळनंतर घरीच थांबणे पसंत करतात.
महिलांचा सामाजिक सहभाग
- आजही महिलांचा सामाजिक सहभाग मर्यादित
- ७१ टक्के महिलांना सामाजिक उपक्रमात रुची; पण २५ टक्के महिला संघटनांशी जोडलेल्या
- एक तृतीयांशहून अधिक महिला नोकरदार महिलांच्या ठिकाणी काम करतात; पण संघटित नाहीत
- झोपड्यांमधील ७५ टक्के महिलांचा कोणत्याही संघटनेशी संबंध नाही
- ८३ टक्के आदिवासी महिला आदिवासी समाजाच्या सदस्य असल्याबद्दल आनंदी
- ६० टक्के शालेय शिक्षिका 'शिक्षक संघटने'शी जोडलेल्या
शहरी झोपडपट्ट्यांची स्थिती
- २४ टक्के वस्त्यांमध्ये अंगणवाडी किंवा बालवाडी नाही, ५१ टक्के वस्त्यांमध्ये प्राथमिक शाळा
- ४५ टक्के वस्त्यांमध्ये घरटी नळ जोडणी नाही.
- ३२ टक्के वस्त्यात वीजेची सोय नाही.
- बहुतेक स्वच्छतागृहांची स्थिती फारच वाईट
- ६७ टक्के ठिकाणी झोपडपट्ट्या सांडपाण्याच्या काठावरच आहेत.
- ६१ टक्के ठिकाणी सांडपाणी व्यवस्था बंदिस्त नाही.
- समाज पीडित महिलांना केवळ सहानुभूती दाखवतो, असे ३१ टक्के महिला म्हणतात.
- ११ टक्के महिला म्हणतात, समाजातील लोक शांतपणे चुकीच्या घटना बघत बसतात.
प्रतिकूलतेतही त्या आनंदी
महिलांना मोकळा वेळ मिळत नाही. ज्यांना मोकळा वेळ मिळतो, त्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू शकत नाहीत. महिला स्वतःचाच विचार करीत नाहीत. स्वतःच्या आरोग्याबद्दलही त्या हलगर्जी आहेत. वैद्यकीय निकषांनुसार महिला आहार घेत नाहीत. एक दंशांशपेक्षा अधिक महिलांच्या जेवणात फक्त एकच मुख्य पदार्थ असतो. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय महिलांत आनंद आणि कल्याणाची पातळी अत्युच्च आहे.
अहवालातील शिफारसी
- महिलांमध्ये मतदार ओळखपत्राबद्दल जागृती निर्माण केली पाहिजे
- संशोधन क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी आरक्षण असावे
- कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवरील समानेतसाठी अधिक प्रयत्नांची गरज
- असंघटित क्षेत्रातील महिलांच्या संघटनासाठी अधिक व्यापक चळवळ हवी
- मासिक पाळीतील आरोग्याविषयी जागरुकता हवी
- कामाच्या आणि शैक्षणिक ठिकाणी महिलांना मूलभूत आणि सुरक्षेच्या सुविधा हव्या आहेत.
- सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी महिलांना प्रोत्साहन दिले पाहिजे
(उत्तरार्ध)
(संकलन : चैत्राली चांदोरकर)