म. टा. प्रतिनिधी, पुणेः भारतीयत्वाचे प्रतीक असलेला तिरंगा पुण्याचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक शनिवारवाड्यावर रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला फडकला अन् ७५ वर्षांपूर्वी भारताने 'नियतीशी केलेल्या करारा'चा क्षण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या रूपाने पुनश्च: अवतरला!
सर्व पुणेकरांच्या वतीने 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या ध्वजारोहणाचा सोहळा नेत्रदीपक ठरला. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचा हा क्षण जगण्यासाठी हजारो पुणेकरांची गर्दी येथे जमली होती. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते रात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. शनिवारवाड्याच्या साक्षीने तिरंगा उंचच उंच फडकत असताना प्रत्येकाचे हात सलामीसाठी आपसूक उंचावले. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' या घोषणांनी शनिवारवाडा दुमदुमला.
१४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून केलेले 'नियतीशी करार' या जगविख्यात भाषणाची ध्वनिफीत पुन्हा ऐकताना रोमांच उभे राहिले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह पुणेकरांच्या उपस्थितीने या सोहळ्यावर अमृतमोहोर उमटवली गेली. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक पराग करंदीकर यांनी स्वागत केले. पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांनी आभार मानले.
दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा १४ ऑगस्टच्या रात्री बारा वाजता देशभरात अभिमानाने तिरंगा फडकला होता. त्या वेळी पुण्यात लिमये नाट्य चित्र मंदिरमध्ये (विजय टॉकीज) झालेल्या या सोहळ्याचे साक्षीदार आजही त्या वेळच्या भारावलेल्या क्षणांची आठवण सांगतात. देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या वेळीही शनिवारवाड्यावर याच पद्धतीने रात्री ध्वजवंदन सोहळा झाला होता. राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण त्या वेळी पुण्याच्या महापौर होत्या. सध्या महापालिकेची मुदत संपली असल्याने लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व पुणेकरांना रात्री १२ वाजता ध्वजवंदन सोहळ्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुणेकरांसाठी पुन्हा २५ वर्षांनी हा योग जुळवून आणला.
सर्व पुणेकरांच्या वतीने 'महाराष्ट्र टाइम्स'ने आयोजित केलेल्या ध्वजारोहणाचा सोहळा नेत्रदीपक ठरला. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याचा हा क्षण जगण्यासाठी हजारो पुणेकरांची गर्दी येथे जमली होती. खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते रात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. शनिवारवाड्याच्या साक्षीने तिरंगा उंचच उंच फडकत असताना प्रत्येकाचे हात सलामीसाठी आपसूक उंचावले. 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' या घोषणांनी शनिवारवाडा दुमदुमला.
१४ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून केलेले 'नियतीशी करार' या जगविख्यात भाषणाची ध्वनिफीत पुन्हा ऐकताना रोमांच उभे राहिले. विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह पुणेकरांच्या उपस्थितीने या सोहळ्यावर अमृतमोहोर उमटवली गेली. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. 'महाराष्ट्र टाइम्स'चे संपादक पराग करंदीकर यांनी स्वागत केले. पुणे आवृत्तीचे संपादक श्रीधर लोणी यांनी आभार मानले.
दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा १४ ऑगस्टच्या रात्री बारा वाजता देशभरात अभिमानाने तिरंगा फडकला होता. त्या वेळी पुण्यात लिमये नाट्य चित्र मंदिरमध्ये (विजय टॉकीज) झालेल्या या सोहळ्याचे साक्षीदार आजही त्या वेळच्या भारावलेल्या क्षणांची आठवण सांगतात. देशाच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याच्या वेळीही शनिवारवाड्यावर याच पद्धतीने रात्री ध्वजवंदन सोहळा झाला होता. राज्यसभेच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण त्या वेळी पुण्याच्या महापौर होत्या. सध्या महापालिकेची मुदत संपली असल्याने लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासकाचा कारभार सुरू आहे. त्यामुळे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व पुणेकरांना रात्री १२ वाजता ध्वजवंदन सोहळ्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी 'महाराष्ट्र टाइम्स'ने पुणेकरांसाठी पुन्हा २५ वर्षांनी हा योग जुळवून आणला.