पिंपरी : करोनाचा मुकाबला करण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात टाटा मोटर्स कंपनीकडून गरजूंना दररोज भोजन, पोलिसांना पिण्याचे पाणी, कुटुंबांना रेशन आणि डॉक्टरांना पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीई) किट या सुविधा पुरविण्यात येत आहेत. कंपनीने स्थलांतरित व अडकून पडलेले समूदाय, शहरी झोपडपट्टीतील निवासी, संक्रमण शिबिरे आणि प्रांतातील गावांमधील लोक, ड्रायव्हर्स, क्लिनर, मेकॅनिक्स, कंत्राटदार, तात्पुरते मजूर, सुरक्षा कर्मचारी यांच्या अन्नपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. रोज दोन हजारांहून अधिक लोकांना शिजवलेले भोजन दिले जाते. आतापर्यंत १७ हजारांहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला आहे. एक हजारांहून अधिक कुटुंबांना रेशन किट्सचे वाटप केले आहे. कंपनीने रोज १९ पोलिस ठाण्यांना २५० लिटरहून अधिक शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. कंपनीने १५० पीपीई युनिट्स, १३ हजार ५०० एन-९५ मास्क्स, ३६ हजार डिस्पोजेबल मास्क्स, एक हजार सॅनिटायझर आणि पाच हजार लिटर सोडियम हायड्रोक्लोराइडचे वाटप केले आहे.
टाटा मोटर्सतर्फे गरजूंना भोजन
करोनाचा मुकाबला करण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाउनच्या काळात टाटा मोटर्स कंपनीकडून गरजूंना दररोज भोजन, पोलिसांना पिण्याचे पाणी, कुटुंबांना रेशन आणि ...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2020, 4:00 am