म. टा. प्रतिनिधी, पुणे
अमित कल्याणकर या पुण्यातील तरुणाने आजचा दिवस (१ मार्च) 'रोटी डे' म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. गेली तीन वर्ष तो हा उपक्रम करत आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे त्याला यंदा राज्यभरात पुणे- मुंबईसह नागपूर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा अशा विविध ठिकाणांहून या उपक्रमासाठी प्रतिसाद मिळत आहे.
तीन वर्षांपूर्वी 'व्हॅलेंटाइन डे'ला फर्ग्युसन कॉलेज रोडवरून मित्राबरोबर जात असताना त्याला एक भुकेला मुलगा दोन विटा मांडून चूल पेटवण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तो जेमतेम ७-८ वर्षांचा होता. त्याच्याशी बोलल्यानंतर अन्न आणि भूक हे दोन महत्त्वाचे प्रश्न अमितच्या लक्षात आले. एका बाजूला हातात बर्गर घेऊन चाललेले तरुण आणि दुसऱ्या बाजूला भुकेला चिमुरडा हे चित्र त्याच्या मनावर परिणाम करणारे ठरले. त्यानंतर त्याने १ मार्चपासून 'रोटी डे' सुरू करायचे ठरवले आणि यात त्याला सुबोध भावे, सुयश टिळक, संग्राम साळवी, नेहा गद्रे, सायली सुनील, सिद्धेश्वर झाडबुके, कश्यप परूळेकर, जगन्नाथ निवंगुणे, विश्वजीत जोशी, अथर्व कर्वे यांसारख्या काही सेलिब्रेटींचीही साथ मिळाली.
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 'ग्लोबल हंगर इंडेक्स'मध्ये यंदा भारताचा क्रमांक १०० वा आहे. गेल्या वर्षी तो ९७ वा होता. या सगळ्या माहितीतूनच भुकेल्यांसाठी आपण काही मदत करावी, असे अमितला वाटले. प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य नाही, तेव्हा प्रत्येकाने आपापल्या घरून आपल्याला योग्य वाटेल, ते ताजे, स्वच्छ आणि चांगले अन्न तयार करून आपल्या जवळच्या भागातील गरजूंपर्यंत पोहोचवावे, असा त्याचा हेतू आहे. 'त्यात फळे, पोळी- भाजी, वरण- भात, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची पीठे, तेल, तूप, गहू, तांदूळ यांसारखे धान्य असे काहीही असू शकते. गरजूंसह एक फोटो फक्त सोशल मीडियावर पोस्ट केला, की या उपक्रमात सहभागी झालेल्यांची संख्या वाढल्याचे लक्षात येईल,' असे अमित म्हणाला. यात त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विविध शाखाही मदत करत आहेत. या उपक्रमासंबंधीच्या अधिक माहितीसाठी इच्छुक व उत्सुकांनी rotidayindia@gmail.com किंवा rotidayindia1stmarch यावर संपर्क साधावा.
अमित कल्याणकर या पुण्यातील तरुणाने आजचा दिवस (१ मार्च) 'रोटी डे' म्हणून साजरा करायचे ठरवले आहे. गेली तीन वर्ष तो हा उपक्रम करत आहे. सोशल मीडियावरील प्रसिद्धीमुळे त्याला यंदा राज्यभरात पुणे- मुंबईसह नागपूर, नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, सातारा अशा विविध ठिकाणांहून या उपक्रमासाठी प्रतिसाद मिळत आहे.
तीन वर्षांपूर्वी 'व्हॅलेंटाइन डे'ला फर्ग्युसन कॉलेज रोडवरून मित्राबरोबर जात असताना त्याला एक भुकेला मुलगा दोन विटा मांडून चूल पेटवण्याचा प्रयत्न करत असलेला दिसला. तो जेमतेम ७-८ वर्षांचा होता. त्याच्याशी बोलल्यानंतर अन्न आणि भूक हे दोन महत्त्वाचे प्रश्न अमितच्या लक्षात आले. एका बाजूला हातात बर्गर घेऊन चाललेले तरुण आणि दुसऱ्या बाजूला भुकेला चिमुरडा हे चित्र त्याच्या मनावर परिणाम करणारे ठरले. त्यानंतर त्याने १ मार्चपासून 'रोटी डे' सुरू करायचे ठरवले आणि यात त्याला सुबोध भावे, सुयश टिळक, संग्राम साळवी, नेहा गद्रे, सायली सुनील, सिद्धेश्वर झाडबुके, कश्यप परूळेकर, जगन्नाथ निवंगुणे, विश्वजीत जोशी, अथर्व कर्वे यांसारख्या काही सेलिब्रेटींचीही साथ मिळाली.
इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूटतर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या 'ग्लोबल हंगर इंडेक्स'मध्ये यंदा भारताचा क्रमांक १०० वा आहे. गेल्या वर्षी तो ९७ वा होता. या सगळ्या माहितीतूनच भुकेल्यांसाठी आपण काही मदत करावी, असे अमितला वाटले. प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य नाही, तेव्हा प्रत्येकाने आपापल्या घरून आपल्याला योग्य वाटेल, ते ताजे, स्वच्छ आणि चांगले अन्न तयार करून आपल्या जवळच्या भागातील गरजूंपर्यंत पोहोचवावे, असा त्याचा हेतू आहे. 'त्यात फळे, पोळी- भाजी, वरण- भात, ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची पीठे, तेल, तूप, गहू, तांदूळ यांसारखे धान्य असे काहीही असू शकते. गरजूंसह एक फोटो फक्त सोशल मीडियावर पोस्ट केला, की या उपक्रमात सहभागी झालेल्यांची संख्या वाढल्याचे लक्षात येईल,' असे अमित म्हणाला. यात त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विविध शाखाही मदत करत आहेत. या उपक्रमासंबंधीच्या अधिक माहितीसाठी इच्छुक व उत्सुकांनी rotidayindia@gmail.com किंवा rotidayindia1stmarch यावर संपर्क साधावा.