म. टा. प्रतिनिधी, पुणे
देवाची उरुळी येथील कचराडेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे काम अद्याप सुरू असून आज, (शुक्रवार) २१ एप्रिलपासून डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कचरा डेपोत लागलेल्या आगीनंतरही शहरातील कोणत्याही भागात कचरा साठू दिलेला नाही. बहुतेक भागातील कचरा दररोज उचलण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
उरुळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे गेल्या सहा दिवसांपासून डेपोत कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही भागात कचराकुंड्या भरून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. डेपोला लागलेली आग अजून पाच ते सहा दिवस तरी आटोक्यात येणार नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरागाड्या येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र कचराडेपोत कचरा टाकण्यास सुरुवात करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असल्याने शहरातील कचरा उचलला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील कचरा उचलला न गेल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने दिला. बुधवारी सर्वसाधारण सभेत पक्षांनी आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले होते. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरा उचलण्याबाबत सूचना केली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून सर्व भागांतील कचरा उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
देवाची उरुळी येथील कचराडेपोला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे काम अद्याप सुरू असून आज, (शुक्रवार) २१ एप्रिलपासून डेपोमध्ये कचरा टाकण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. कचरा डेपोत लागलेल्या आगीनंतरही शहरातील कोणत्याही भागात कचरा साठू दिलेला नाही. बहुतेक भागातील कचरा दररोज उचलण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
उरुळी, फुरसुंगी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे गेल्या सहा दिवसांपासून डेपोत कचरा टाकणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील काही भागात कचराकुंड्या भरून वाहत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. डेपोला लागलेली आग अजून पाच ते सहा दिवस तरी आटोक्यात येणार नसल्याचे अग्निशमन दलाने सांगितले. त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी पालिकेच्या कचरागाड्या येऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र कचराडेपोत कचरा टाकण्यास सुरुवात करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असल्याने शहरातील कचरा उचलला जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शहरातील कचरा उचलला न गेल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेने दिला. बुधवारी सर्वसाधारण सभेत पक्षांनी आंदोलन करून प्रशासनाला वेठीस धरले होते. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कचरा उचलण्याबाबत सूचना केली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून सर्व भागांतील कचरा उचलणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.