म. टा. प्रतिनिधी, पुणे
चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अभ्यासक्रमाचे नियम बदलण्याच्या मागणीसाठी वर्गामध्ये अनुपस्थित राहणाऱ्या दिग्दर्शन विभागाच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. चित्रपट विभागाचे प्रमुख अमित त्यागी यांनी ४७ विद्यार्थ्यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून ५ विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थी प्रकल्प पूर्ण न करता तीन वर्षांपेक्षा अधिक काळ संस्थेमध्ये राहतात, हे लक्षात घेऊन नियम कडक करून अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. दिग्दर्शन विभागाच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती. नियम बदलत नाही तोपर्यंत वर्गामध्ये उपस्थित राहणार नाही, तसेच प्रकल्पही पूर्ण न करण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने त्यागी यांनी ४७ विद्यार्थ्यांना नोटीस व पाच जणांना १४ ऑक्टोबरपर्यंत वसतिगृह सोडण्याचे थेट आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा कालावधी द्यावा, यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सेटचा आकार वाढविण्यात यावा, डायलॉग प्रकल्पासाठी स्टुडियो एक मध्ये चित्रीकरण करण्यास परवानगी द्यावी, आदी विविध मागण्यांचे पत्र विद्यार्थ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या संचालकांना लिहिले होते. संस्थेने यासंदर्भात विचार सुरू असून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे आवाहन केले होते. मात्र विद्यार्थ्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने ही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. यासंदर्भात त्यागी व संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
चित्रपट व दूरचित्रवाणी संस्थेच्या (एफटीआयआय) अभ्यासक्रमाचे नियम बदलण्याच्या मागणीसाठी वर्गामध्ये अनुपस्थित राहणाऱ्या दिग्दर्शन विभागाच्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. चित्रपट विभागाचे प्रमुख अमित त्यागी यांनी ४७ विद्यार्थ्यांना यासंदर्भात नोटीस बजावली असून ५ विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यार्थी प्रकल्प पूर्ण न करता तीन वर्षांपेक्षा अधिक काळ संस्थेमध्ये राहतात, हे लक्षात घेऊन नियम कडक करून अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. दिग्दर्शन विभागाच्या दुसऱ्या वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नियम बदलण्याची मागणी केली होती. नियम बदलत नाही तोपर्यंत वर्गामध्ये उपस्थित राहणार नाही, तसेच प्रकल्पही पूर्ण न करण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतल्याने त्यागी यांनी ४७ विद्यार्थ्यांना नोटीस व पाच जणांना १४ ऑक्टोबरपर्यंत वसतिगृह सोडण्याचे थेट आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा कालावधी द्यावा, यासाठी तयार करण्यात येणाऱ्या सेटचा आकार वाढविण्यात यावा, डायलॉग प्रकल्पासाठी स्टुडियो एक मध्ये चित्रीकरण करण्यास परवानगी द्यावी, आदी विविध मागण्यांचे पत्र विद्यार्थ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी संस्थेच्या संचालकांना लिहिले होते. संस्थेने यासंदर्भात विचार सुरू असून विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे आवाहन केले होते. मात्र विद्यार्थ्यांनी आपला पवित्रा कायम ठेवल्याने ही कारवाईची कुऱ्हाड कोसळली आहे. यासंदर्भात त्यागी व संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.