अ‍ॅपशहर

‘उत्कट लेखनामुळे गाजली गीते’

म टा प्रतिनिधी, पुणे'हिंदी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जीवनातील सर्व भावभावनांचा विचार करून उत्कट गीतलेखन केले...

Maharashtra Times 11 Jun 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'हिंदी गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जीवनातील सर्व भावभावनांचा विचार करून उत्कट गीतलेखन केले. त्यामुळे त्यांची गीते सजली आणि लोकप्रिय ठरली,' असे मत हिंदी भाषेच्या अभ्यासक प्रा. शलाका गोळे यांनी व्यक्त केले.

रसिक मित्र मंडळ आयोजित पत्रकार भवन येथे झालेल्या 'एक कवी एक भाषा' या मासिक व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. हे व्याख्यानमालेचे ५६ वे पुष्प होते. मंडळाचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला यांनी स्वागत केले. अध्यक्षस्थानी डॉ. प्रकाश कामत होते. मंडळाच्या विश्वस्त डॉ. शशीकला शिरगोपीकर उपस्थित होत्या.

गोळे म्हणाल्या 'राजेंद्र कृष्ण यांनी सर्व छटा असलेली गीते लिहिली. त्यात देशभक्तीपर गीतांचाही समावेश होता. 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती है बसेरा', 'सुनो सुनो बापूजी की अमर कहानी' ही देशभक्तीपर गीते गाजली. 'कौन आया मेरे मन के द्वारे', 'दो घडी वो पास आ बैठे', 'हम जमाने से दूर जा बैठे', 'इना मिना डिका', 'मेरे पिया गए रंगून' यांसारखी गीतेही लिहून त्यांनी वैविध्य दाखवले.' कामत म्हणाले, '२०१८ हे वर्ष राजेंद्र कृष्ण यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. अशा वेळी या महान गीतकाराच्या शब्दांना उजाळा दिला पाहिजे.'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज