म. टा. प्रतिनिधी, पुणे
मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर सोडण्यात विशेष गाड्यांच्या प्रवासासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा अधिक दराने तिकीट काढावे लागणार आहे. या गाड्यांचे तिकीट ६० रुपयांनी अधिक असणार आहे. विशेष गाड्यांसाठी अशा प्रकारचे वाढीव शुल्क आकारण्याला रेल्वे प्रवासी ग्रुपने विरोध केला आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत गणेशोत्सवाच्या काळात मध्ये रेल्वे पुणे-झाराप आणि पुणे-रत्नागिरी या मार्गांवर सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते पाच सप्टेंबरदरम्यान या गाड्या धावणार आहेत. त्यांचे तिकीट बुकिंग आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दहा या वेळेत बुकिंग करता येणार आहे. नेहमीच्या तिकीट दरापेक्षा तिकिटासाठी साठ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. तसेच, वेळेत तिकीट न मिळाल्यास प्रवाशांना तत्काळ तिकीट काढावे लागणार आहे. त्या तिकिटाचे दरही अधिक असतात. त्यामुळे कोकणचा विशेष प्रवास प्रवाशांना महागात पडणार आहे.
या गाड्या सायंकाळी पुण्याहून सोडल्यामुळे झारापच्या आधी येणाऱ्या स्टेशनवर उतरणारे प्रवासी आपापल्या मुक्कामी रात्री उशिरा पोचणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.
मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी कोकण मार्गावर सोडण्यात विशेष गाड्यांच्या प्रवासासाठी प्रवाशांना नेहमीपेक्षा अधिक दराने तिकीट काढावे लागणार आहे. या गाड्यांचे तिकीट ६० रुपयांनी अधिक असणार आहे. विशेष गाड्यांसाठी अशा प्रकारचे वाढीव शुल्क आकारण्याला रेल्वे प्रवासी ग्रुपने विरोध केला आहे.
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत गणेशोत्सवाच्या काळात मध्ये रेल्वे पुणे-झाराप आणि पुणे-रत्नागिरी या मार्गांवर सहा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एक ते पाच सप्टेंबरदरम्यान या गाड्या धावणार आहेत. त्यांचे तिकीट बुकिंग आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे. सकाळी आठ ते दहा या वेळेत बुकिंग करता येणार आहे. नेहमीच्या तिकीट दरापेक्षा तिकिटासाठी साठ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. तसेच, वेळेत तिकीट न मिळाल्यास प्रवाशांना तत्काळ तिकीट काढावे लागणार आहे. त्या तिकिटाचे दरही अधिक असतात. त्यामुळे कोकणचा विशेष प्रवास प्रवाशांना महागात पडणार आहे.
या गाड्या सायंकाळी पुण्याहून सोडल्यामुळे झारापच्या आधी येणाऱ्या स्टेशनवर उतरणारे प्रवासी आपापल्या मुक्कामी रात्री उशिरा पोचणार आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे, असे मत रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी व्यक्त केले.