- मंदार लवाटे
ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कागदाच्या वर ‘श्री’कार काढलेला आढळतो. मंगलवाचक, ऐश्वर्यसूचक पद म्हणून हा श्रीकार काढलेला असतो. श्रीकाराप्रमाणे निरनिराळ्या देवतांचे उपासक आपापल्या देवतेचे नाव पत्राच्या वर आवर्जून लिहीत. या देवतेच्या नावावरून पत्र कोणाचे आहे ते ओळखणे सोपे जाते. रामदास स्वामींच्या पत्रावर ‘श्री राम समर्थ’ असे लिहिलेले असे. रघुनाथराव पेशव्यांच्या पत्रावर ‘श्री सांबोजयति’, ’श्री शंकर’, ‘श्री सांब’ असे लिहिलेले आढळते. पुढे पुढे ‘श्री सांबपुत्रो जयति’ असे रघुनाथराव लिहू लागले. नागपूरकर भोसल्यांच्या पत्रावर रामास, तर हिम्मत बहाद्दर चव्हाणांच्या पत्रावर ‘केदारलिंग’ अर्थात जोतीबास नमन केलेले आढळते. मस्तानीचा पुत्र समशेरबहाद्दर पत्रावर ‘पांडुरंग कृपा’ असे लिहित असे. इब्राहीम आदिलशहा (दुसरा) त्याच्या पत्रावर ‘अज पूजा सरसोती’ असे म्हणजे सरस्वतीस नमन करत असे. सरस्वती माझी आई व गणपती माझा पिता अशी त्याची भावना होती. गणपतीचे भक्त अर्थातच गणपतीचे नाव पत्रावर लिहीत. पराक्रमी व इतिहासातील प्रसिद्ध सरदार गोपाळराव पटवर्धन पत्रावर स्वतःच्या हाताने ‘गणराज’ असे लिहीत, तर त्यांचे वडील गोविंद हरी पत्रावर ‘गणपतीर्जयती’ असे लिहीत असत. परशुरामभाऊ नुसते गणपती असे लिहीत असत. गणराज असे पत्रावर लिहिणाऱ्या एकूण २१ व्यक्ती आढळतात असे ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. शं. ना. जोशी यांनी म्हटले आहे. मोरया असे लिहिणाऱ्या २३ व्यक्ती त्यांना आढळल्या. गणपती, हेरंब असे लिहिलेली पत्रही आढळतात. यशवंतराव दाभाडे यांच्या पत्रावर ‘श्री मोरया’ असे लिहिलेले आढळते. नारोशंकर राजेबहाद्दर, सदाशिव माणकेश्वर पत्रावर ‘श्री गजानन’ असे लिहीत. सर्जेराव घाटगे पत्राच्या सुरुवातीला ‘श्री गणेश प्रसन्न’ असे लिहीत. बापू गोखल्यांचे काका विसाजीराम ‘श्री गजानन प्रसन्न’ असे लिहीत असत. पटवर्धन घराण्याचा पत्रांमध्ये तर अगदी एक दोन ओळीची चिठ्ठी असली, तरी त्यावरही गणपतीचे नाव लिहिले जाई. पटवर्धन घराण्याप्रमाणे मोरया गोसावी व त्यांचे वंशज हे गणेशभक्त म्हणून विख्यात. देवांचे लाखो कागद भारत इतिहास संशोधक मंडळात असून, त्यांच्या पत्रावर ‘मोरया’ अथवा ‘श्री गणपती’ असा शिक्काच आढळतो.
ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये कागदाच्या वर ‘श्री’कार काढलेला आढळतो. मंगलवाचक, ऐश्वर्यसूचक पद म्हणून हा श्रीकार काढलेला असतो. श्रीकाराप्रमाणे निरनिराळ्या देवतांचे उपासक आपापल्या देवतेचे नाव पत्राच्या वर आवर्जून लिहीत. या देवतेच्या नावावरून पत्र कोणाचे आहे ते ओळखणे सोपे जाते. रामदास स्वामींच्या पत्रावर ‘श्री राम समर्थ’ असे लिहिलेले असे. रघुनाथराव पेशव्यांच्या पत्रावर ‘श्री सांबोजयति’, ’श्री शंकर’, ‘श्री सांब’ असे लिहिलेले आढळते. पुढे पुढे ‘श्री सांबपुत्रो जयति’ असे रघुनाथराव लिहू लागले. नागपूरकर भोसल्यांच्या पत्रावर रामास, तर हिम्मत बहाद्दर चव्हाणांच्या पत्रावर ‘केदारलिंग’ अर्थात जोतीबास नमन केलेले आढळते. मस्तानीचा पुत्र समशेरबहाद्दर पत्रावर ‘पांडुरंग कृपा’ असे लिहित असे. इब्राहीम आदिलशहा (दुसरा) त्याच्या पत्रावर ‘अज पूजा सरसोती’ असे म्हणजे सरस्वतीस नमन करत असे. सरस्वती माझी आई व गणपती माझा पिता अशी त्याची भावना होती. गणपतीचे भक्त अर्थातच गणपतीचे नाव पत्रावर लिहीत. पराक्रमी व इतिहासातील प्रसिद्ध सरदार गोपाळराव पटवर्धन पत्रावर स्वतःच्या हाताने ‘गणराज’ असे लिहीत, तर त्यांचे वडील गोविंद हरी पत्रावर ‘गणपतीर्जयती’ असे लिहीत असत. परशुरामभाऊ नुसते गणपती असे लिहीत असत. गणराज असे पत्रावर लिहिणाऱ्या एकूण २१ व्यक्ती आढळतात असे ज्येष्ठ इतिहास संशोधक कै. शं. ना. जोशी यांनी म्हटले आहे. मोरया असे लिहिणाऱ्या २३ व्यक्ती त्यांना आढळल्या. गणपती, हेरंब असे लिहिलेली पत्रही आढळतात. यशवंतराव दाभाडे यांच्या पत्रावर ‘श्री मोरया’ असे लिहिलेले आढळते. नारोशंकर राजेबहाद्दर, सदाशिव माणकेश्वर पत्रावर ‘श्री गजानन’ असे लिहीत. सर्जेराव घाटगे पत्राच्या सुरुवातीला ‘श्री गणेश प्रसन्न’ असे लिहीत. बापू गोखल्यांचे काका विसाजीराम ‘श्री गजानन प्रसन्न’ असे लिहीत असत. पटवर्धन घराण्याचा पत्रांमध्ये तर अगदी एक दोन ओळीची चिठ्ठी असली, तरी त्यावरही गणपतीचे नाव लिहिले जाई. पटवर्धन घराण्याप्रमाणे मोरया गोसावी व त्यांचे वंशज हे गणेशभक्त म्हणून विख्यात. देवांचे लाखो कागद भारत इतिहास संशोधक मंडळात असून, त्यांच्या पत्रावर ‘मोरया’ अथवा ‘श्री गणपती’ असा शिक्काच आढळतो.