म. टा. प्रतिनिधी, पुणे
पेशवेकाळापासून पुण्यनगरीचे भूषण असलेला सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवास आज, गुरुवारी दिमाखात प्रारंभ होत आहे. करोनामुळे यंदा कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जुन्या वस्तू व संगीत वाद्य यांचे प्रदर्शन असे कार्यक्रम होणार नाहीत. साधेपणाने साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता रविवारी, ऋषिपंचमी दिवशी होणार आहे.
शनिवारवाड्याच्या बाजूला सरदार मुजुमदार वाडा प्रसिद्ध आहे. आबासाहेब मुजुमदार यांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार हे या उत्सवाची पंरपरा जोपासत आहेत.
'वाड्यातील गणेश महालामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला वल्लभेष गणेशाची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना होते. १९ ऑगस्ट रोजी अमावस्या सूर्योदयानंतर संपुष्टात येत असल्याने गणरायाची प्रतिष्ठापना प्रतिपदा आणि द्वितीयेला गुरुवारी होणार आहे. देवघरातून श्रींची पंचधातूची मूर्ती वाजत-गाजत गणेश महालामध्ये आणली जाईल. लाकडी कोरीव कामाच्या मयूरासनावर विधिपूर्वक या दहा हातांच्या शस्त्रधारी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. या गणेशाच्या सर्व हातांमध्ये आयुधे असून, शारदेसह पितळी मखरात कमळावर ही मूर्ती आसनस्थ आहे. लघुरुद्र, ब्रह्मणेस्पतीसूक्त आणि अथर्वशीर्षाची आवर्तने होऊन दररोज शोडषोपचार पूजा होईल,' अशी माहिती अनुपमा मुजुमदार यांनी दिली. करोनामुळे बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यंदा सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऋषिपंचमी हा उत्सवाच्या सांगतेचा दिवस असतो. त्या दिवशी रात्री तीर्थप्रसादाचे कीर्तन म्हणजेच लळीत झाल्यावर मखरावर पडदा टाकून मूर्ती पुनरागमनायच म्हणत परत देवघरात नेऊन ठेवायची, अशी मुजुमदार घराण्याची परंपरा आहे.
पेशवेकाळापासून पुण्यनगरीचे भूषण असलेला सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्या मुजुमदार वाड्यातील गणेशोत्सवास आज, गुरुवारी दिमाखात प्रारंभ होत आहे. करोनामुळे यंदा कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जुन्या वस्तू व संगीत वाद्य यांचे प्रदर्शन असे कार्यक्रम होणार नाहीत. साधेपणाने साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवाची सांगता रविवारी, ऋषिपंचमी दिवशी होणार आहे.
शनिवारवाड्याच्या बाजूला सरदार मुजुमदार वाडा प्रसिद्ध आहे. आबासाहेब मुजुमदार यांचे नातू प्रताप मुजुमदार आणि नातसून अनुपमा मुजुमदार हे या उत्सवाची पंरपरा जोपासत आहेत.
'वाड्यातील गणेश महालामध्ये भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला वल्लभेष गणेशाची पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना होते. १९ ऑगस्ट रोजी अमावस्या सूर्योदयानंतर संपुष्टात येत असल्याने गणरायाची प्रतिष्ठापना प्रतिपदा आणि द्वितीयेला गुरुवारी होणार आहे. देवघरातून श्रींची पंचधातूची मूर्ती वाजत-गाजत गणेश महालामध्ये आणली जाईल. लाकडी कोरीव कामाच्या मयूरासनावर विधिपूर्वक या दहा हातांच्या शस्त्रधारी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाईल. या गणेशाच्या सर्व हातांमध्ये आयुधे असून, शारदेसह पितळी मखरात कमळावर ही मूर्ती आसनस्थ आहे. लघुरुद्र, ब्रह्मणेस्पतीसूक्त आणि अथर्वशीर्षाची आवर्तने होऊन दररोज शोडषोपचार पूजा होईल,' अशी माहिती अनुपमा मुजुमदार यांनी दिली. करोनामुळे बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यंदा सार्वजनिक कार्यक्रम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऋषिपंचमी हा उत्सवाच्या सांगतेचा दिवस असतो. त्या दिवशी रात्री तीर्थप्रसादाचे कीर्तन म्हणजेच लळीत झाल्यावर मखरावर पडदा टाकून मूर्ती पुनरागमनायच म्हणत परत देवघरात नेऊन ठेवायची, अशी मुजुमदार घराण्याची परंपरा आहे.