उरुळी देवाची, फुरसुंगी ग्रामस्थांची बैठक निष्फळ
म. टा. प्रतिनिधी, पुणे
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. महापौर, प्रभारी आयुक्त यांच्या विनंतीनंतरही ग्रामस्थांनी डेपोत कचरा टाकण्याबाबत अडवणुकीची भूमिका कायम ठेवली आहे. ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या पुन्हा अडविण्यास सुरुवात केल्याने येत्या काही दिवसांत शहरातील कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा टाकू देणार नाही अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या परत पाठविल्या जात आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत शनिवारी ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांच्यासह कचरा डेपो हटाव समितीचे पदाधिकारी तात्या भाडळे, जालिंदर कामठे, विजय भाडळे, संजय हरपळे, अमोल हरपळे, मच्छिंद्र कामठे बैठकीला उपस्थित होते.
डेपोत कचरा टाकण्याच्या बदल्यात दोन्ही गावातील अनेक विकासकामे महापालिकेने केली आहेत. त्यासाठी आतापर्यंत ६६ कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. त्यामुळे डेपोचा मार्ग न अडविण्याची विनंती महापौरांनी केली. मात्र, ग्रामस्थ बधले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत नऊ महिन्यात डेपो बंद करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता मिळून २५ महिने झाले तरी कोणी फिरकले नाही. त्यामुळे आता कोणत्याही स्थितीत कचरा टाकू देणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
शहरात दुर्गंधीचे साम्राज्य
कचरा उचचला जात नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कचरा टाकण्यास विरोध करणारे ग्रामस्थ विनंतीला भीक घालत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांसह पालिकेच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी झालेली बैठक निष्फळ ठरली. महापौर, प्रभारी आयुक्त यांच्या विनंतीनंतरही ग्रामस्थांनी डेपोत कचरा टाकण्याबाबत अडवणुकीची भूमिका कायम ठेवली आहे. ग्रामस्थांनी कचऱ्याच्या गाड्या पुन्हा अडविण्यास सुरुवात केल्याने येत्या काही दिवसांत शहरातील कचरा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.
कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा टाकू देणार नाही अशी भूमिका घेऊन ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या परत पाठविल्या जात आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्या उपस्थितीत शनिवारी ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप यांच्यासह कचरा डेपो हटाव समितीचे पदाधिकारी तात्या भाडळे, जालिंदर कामठे, विजय भाडळे, संजय हरपळे, अमोल हरपळे, मच्छिंद्र कामठे बैठकीला उपस्थित होते.
डेपोत कचरा टाकण्याच्या बदल्यात दोन्ही गावातील अनेक विकासकामे महापालिकेने केली आहेत. त्यासाठी आतापर्यंत ६६ कोटी रुपये खर्चण्यात आले आहेत. त्यामुळे डेपोचा मार्ग न अडविण्याची विनंती महापौरांनी केली. मात्र, ग्रामस्थ बधले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत नऊ महिन्यात डेपो बंद करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, सत्ता मिळून २५ महिने झाले तरी कोणी फिरकले नाही. त्यामुळे आता कोणत्याही स्थितीत कचरा टाकू देणार नाही, असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले.
शहरात दुर्गंधीचे साम्राज्य
कचरा उचचला जात नसल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसू लागले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. कचरा टाकण्यास विरोध करणारे ग्रामस्थ विनंतीला भीक घालत नसल्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ठोस भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.