म. टा. प्रतिनिधी, लातूर
भारतासारख्या देशासाठी चांगले वैज्ञानिक निर्माण होण्याची आज गरज आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये भारत आजही जागतीक पातळीवरती पाठीमागे आहे. विज्ञानातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषिक मिळविण्यामध्ये भारतीय वैज्ञानिकांना यश प्राप्त होत नाही. त्यासाठी बालवैज्ञानिकांनी विज्ञानामध्ये कास जोपासून भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये सक्षमपणे भूमिका अदा करावी, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी केले. नागपूर येथील राज्य विज्ञान मंडळ व दयांनद विज्ञान महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्ह्यातील विविध शाळेतील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी आयोजित पाच दिवसीय विज्ञान मंच या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रंसगी प्राचार्य डॉ. दरगड बोलत होते. याप्रसंगी माध्यमिक शिक्षण विभागाचे बालवाड, डॉ. डी. टी. जगताप, प्रा. जी. बी. अवस्थी यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा. जी. बी. आवस्थी यांनी केले.सूत्रसंचालन डॉ. प्रमोद माने यांनी केले. कार्यक्रमास डॉ. सी. एस. स्वामी, प्रा. निलंगे, प्रा. गरड, प्रा. कदम, प्रा. अंभोरे तसेच पालकवर्ग यांची उपस्थिती होती.