अ‍ॅपशहर

अतिवृष्टीचा पुणे जिल्ह्याला जबर फटका, नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत 'एवढे' कोटी

परतीच्या पावसामुळे पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. पुणे जिल्हा प्रशासनाने झालेल्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून राज्य सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. सांगली जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा समोर आला आहे.

महाराष्ट्र टाइम्स 29 Oct 2020, 9:27 am
म. टा. प्रतिनिधी, पुणेः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे ६६ कोटी ९७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार करून राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त नागरिकांना मदतीसाठी निधीच्या मागणीचा प्रस्ताव पाठविला आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा फटका सुमारे एक लाख ७२ हजार ८७१ नागरिकांना बसला असून, सर्वाधिक नुकसान इंदापूर तालुक्यात झाले आहे. त्याखालोखाल पुरंदर आणि बारामती तालुक्यात शेती, फळबागा आणि शेतजमिनींचे नुकसान झाल्याचे या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pune rain
अतिवृष्टीचा पुणे जिल्ह्याला जबर फटका, नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत 'एवढे' कोटी


जिल्ह्यामध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार सुमारे ६६ कोटी ९७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामध्ये शेतीच्या नुकसानाबरोबरच घरे आणि गोठ्यांची झालेली पडझड, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आणि जनावरे यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एक हजार ६०४ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत. या गावांतील एक लाख ७२ हजार ८७१ नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या गावांमधील सुमारे ६८ हजार हेक्टर क्षेत्रफळावरील पिके, फळबागा आणि घरांचे नुकसान झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सर्वाधिक नुकसान इंदापूर तालुक्यात झाले असून, या तालुक्यातील सुमारे १४ हजार ३९५ हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाले आहे. त्यानंतर पुरंदर तालुक्यात १२ हजार २३३ हेक्टर, बारामती तालुक्यातील १० हजार ४५९ हेक्टर क्षेत्रफळ बाधित झाल्याचे आढळले आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी सुमारे ६६ कोटी ९७ लाख रुपयांच्या निधीची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. संबंधित नागरिकांना लवकर मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी

साताऱ्यात मधमाशांच्या हल्ल्यात दोन लहान मुलींचा दुर्दैवी मृत्यू

शिवसेनेची ताकद कमी होतेय? शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला 'हा' पर्याय

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने ३४ हजार हेक्ट रवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीने सांगली जिल्ह्यातील ३४ हजार ८८ हेक्टकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारी नियमानुसार ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागाकडून पूर्ण झाले. ७५ हजार ४०१ शेतकऱ्यांचे सुमारे ३७ कोटी ६५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. नुकसानीचा अहवाल तातडीने राज्य सरकारकडे पाठवला असून, लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षकांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज