अ‍ॅपशहर

ताहेरभाईंची लढाई पुढे नेऊ

'ताहेरभाई पूनावाला हे मिश्किल स्वभावाचे होते. ते वैचारिक निष्ठा कायम ठेवून समृद्ध जीवन जगले. ते कार्यकर्ते म्हणून जेवढे मोठे तेवढे त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठे होते. त्यांची लढाई खूप ताकदीने पुढे नेण्याची गरज असून ती आम्ही पुढे नेऊ,' अशा शब्दांत विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ ताहेरभाई पूनावाला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Maharashtra Times 23 Aug 2017, 3:05 am
श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी केला निश्चय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम homaege to taher poonawala taher poonawala anwar rajan subhash ware
ताहेरभाईंची लढाई पुढे नेऊ

म. टा. प्रतिनिधी, पुणे
'ताहेरभाई पूनावाला हे मिश्किल स्वभावाचे होते. ते वैचारिक निष्ठा कायम ठेवून समृद्ध जीवन जगले. ते कार्यकर्ते म्हणून जेवढे मोठे तेवढे त्यांचे व्यक्तिमत्त्वही मोठे होते. त्यांची लढाई खूप ताकदीने पुढे नेण्याची गरज असून ती आम्ही पुढे नेऊ,' अशा शब्दांत विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आणि सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ ताहेरभाई पूनावाला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

सामाजिक कृतज्ञता निधीतर्फे आयोजित श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी ताहेरभाईंच्या आठवणींना उजाळा दिला. जेष्ठ कामगार नेते डॉ.बाबा आढाव, प्रा. सुभाष वारे, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, अन्वर राजन, डॉ. हमीद दाभोलकर, ताहेरभाईंच्या पत्नी डॉ. झैनब पूनावाला, कन्या शबनम पूनावाला, नात सना पूनावाला या वेळी उपस्थित होते.
‘ताहेरभाई यांना कसलाही अहंकार नव्हता. त्यांना गप्पा मारायला खूप आवडत. त्यांनी नेहमी माणसे जोडली. स्वतःसाठी काहीही न मागता ते दुसऱ्यांच्या आयुष्यात सतत आनंद फुलवत राहिले,’ अशा शब्दांत आढाव यांनी ताहेरभाईंच्या व्यक्तिमत्त्वाला आणि कार्याला उजाळा दिला.
सुभाष वारे म्हणाले, ‘ताहेरभाई यांचे चळवळीला मोठे वैचारिक पाठबळ होते. ते कार्यकर्ते म्हणून जेवढे मोठे तेवढे त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे होते. त्यांची लढाई खूप ताकदीने पुढे नेण्याची गरज आहे.’
सय्यदभाई म्हणाले, ‘ताहेरभाई नेहमी समोरच्या माणसाचा आदर करीत. काम करणारी माणसे त्यांना फार आवडत. तत्त्व आणि परिवर्तन विचारांशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही.’
‘ताहेरभाई यांचा प्रवास खूप खडतर होता. वैचारिक निष्ठा कायम ठेवून ते समृद्ध जीवन जगले. त्यांनी विचारात कधी तडजोड केली नाही. वैचारिक वाद झाले तरी व्यक्तिगत पातळीवर मैत्री कायम जपली,’ असे अन्वर राजन यांनी सांगितले.
‘ताहिरभाई समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी झटत होते. प्रवाहाविरूद्ध जाऊन परिस्थितीला तोंड देत. हे आम्हाला कौतुकास्पद वाटे. ते नेहमी काम करत राहिले. कधी तक्रार, निराशा नाही. त्यांनी कधीही हार मानली नाही,’ अशी भावना विलास वाघ यांनी व्यक्त केली. रत्नाकर महाजन, झैनब पूनावाला, सना पूनावाला आदींनी या वेळी श्रद्धांजली वाहिली.
..
माझे बाबा खूप वेगळे होते. त्यांचा स्वभाव मनमोकळा होता. एखाद्या विषयावर वाद होत असताना ते कधी माघार घेत नसत. मात्र, ते समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधी कायम देत असत.

- शबनम पूनावाला, (ताहेर पूनावाला यांची कन्या)

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज