अ‍ॅपशहर

​‘परागीभवनामध्ये मधमाशा कुशल’

वनस्पतींचे परागी भवन करणाऱ्या कीटकांमध्ये मधमाशा या सर्वाधिक प्रभावी आणि अत्यंत कुशल आहेत. अनेक प्रयोगातून निसर्गातील त्यांची भूमिका सिद्ध झाली आहे. शाश्वत कृषीचा त्या विश्वासार्ह भाग असल्याने मधमाशा पालनासाठी योजनापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेचे निवृत्त संशोधन अधिकारी डॉ. क. कृ. क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

Maharashtra Times 6 Dec 2016, 3:00 am
पुणे ः वनस्पतींचे परागी भवन करणाऱ्या कीटकांमध्ये मधमाशा या सर्वाधिक प्रभावी आणि अत्यंत कुशल आहेत. अनेक प्रयोगातून निसर्गातील त्यांची भूमिका सिद्ध झाली आहे. शाश्वत कृषीचा त्या विश्वासार्ह भाग असल्याने मधमाशा पालनासाठी योजनापूर्वक प्रयत्न केले पाहिजेत, असे मत केंद्रीय मधमाशा संशोधन संस्थेचे निवृत्त संशोधन अधिकारी डॉ. क. कृ. क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम honye bee dr k k kshirsagar
​‘परागीभवनामध्ये मधमाशा कुशल’

वन विभागाने दोन दिवसांपूर्वी घेतलेल्या कार्यशाळेमध्ये वरिष्ठ वन्यजीव शास्त्रज्ञ रेनी बोर्जिस यांनी वनक्षेत्रात मधमाशी पालनावर नियंत्रण आणावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या विधानाला क्षीरसागर यांनी विरोध केला.
जंगलांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यात मधमाशांचा मोठा वाटा आहे. एकाच मोहोळातील त्यांची हजारोंची संख्या, त्यांनी निवडलेल्या एकाच जातीच्या वनस्पतीची त्यांची फूल भेट आणि पुष्पनिष्ठा, फुलांना न दुखविता अन्न संकलनाची कला, पुष्परस संकलनासाठी आवश्यक असलेली शरीररचना आणि स्वभावाबद्दल सविस्तर अभ्यास झाला असून कार्ल फॉन फ्रिश यांना त्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे. मधमाशांमुळे वनस्पती वैविध्य टिकून राहते एवढेच नाही तर ते वाढतेही. भीमाशंकर भागात ठेवण्यात येणाऱ्या मोहोळांमुळे परिसंस्थेला काहीच फायदा होत नाही हे विधान अशास्त्रीय आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज