पुणे:
नागरिकांच्या सेल्फी आणि फोटोंच्या अतिरेकाला वैतागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट एक खून माफ करण्याची परवानगी राष्ट्रपतींकडे मागणार असल्याचे वक्तव्य रविवारी केले. 'ज्याने मोबाइलमध्ये कॅमेरा आणला, त्याचा मला पहिला खून करायचा आहे. लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे सोडून दिले आहे; पाहावे तिकडे सेल्फी, फोटो... त्यामुळे राष्ट्रपतींकडे जाऊन त्यांना एक खून माफ करण्याची परवानगी मागणार आहे,' अशा शब्दांत ठाकरे यांनी सेल्फी आणि फोटो काढणाऱ्यांविषयीच्या आपल्या भावनेला मोकळी वाट करून दिली.
पुण्यातील कात्रज येथे नगरसेवक वसंत मोरे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे बोलत होते. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते. 'एवढे चांगले उद्यान उभे केले आहे. त्यासाठी अनेक लोक झटले आहेत. त्यांच्या मेहनतीने हे उद्यान उभे राहिले आहे. फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांच्या गर्दीमुळे ते नीट पाहताही येत नाही. सगळे जण आपले बाजूला उभे असतात', अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. 'मी कोणालाही न सांगता येथे येईन, असे आपण मोरे यांना सांगितले होते, ते यासाठीच,' अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
नागरिकांच्या सेल्फी आणि फोटोंच्या अतिरेकाला वैतागल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट एक खून माफ करण्याची परवानगी राष्ट्रपतींकडे मागणार असल्याचे वक्तव्य रविवारी केले. 'ज्याने मोबाइलमध्ये कॅमेरा आणला, त्याचा मला पहिला खून करायचा आहे. लोकांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहायचे सोडून दिले आहे; पाहावे तिकडे सेल्फी, फोटो... त्यामुळे राष्ट्रपतींकडे जाऊन त्यांना एक खून माफ करण्याची परवानगी मागणार आहे,' अशा शब्दांत ठाकरे यांनी सेल्फी आणि फोटो काढणाऱ्यांविषयीच्या आपल्या भावनेला मोकळी वाट करून दिली.
पुण्यातील कात्रज येथे नगरसेवक वसंत मोरे यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी ठाकरे बोलत होते. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक या वेळी उपस्थित होते. 'एवढे चांगले उद्यान उभे केले आहे. त्यासाठी अनेक लोक झटले आहेत. त्यांच्या मेहनतीने हे उद्यान उभे राहिले आहे. फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांच्या गर्दीमुळे ते नीट पाहताही येत नाही. सगळे जण आपले बाजूला उभे असतात', अशी खंत ठाकरे यांनी व्यक्त केली. 'मी कोणालाही न सांगता येथे येईन, असे आपण मोरे यांना सांगितले होते, ते यासाठीच,' अशी पुस्तीही त्यांनी जोडली.