पुणे:
'आजच्या काळातील चित्रपटांपासून दूर राहिलेलेच बरे. काय हे आजच्या काळातील चित्रपट? पण 'बैजू बावरा' आणि 'मुघले आजम'सारख्या चित्रपटांची निर्मिती होणार असेल तर अशा चित्रपटांना संगीत द्यायला मला नक्की आवडेल. अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना संगीत देण्याचा प्रयोग मी पुन्हा करेन'. हे उद्गार आहेत ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे. चौरसिया यांनी वयाची ऐंशी गाठली आहे. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी या मुलाखतीत त्यांचा जीवन प्रवास उलगडवू दाखवला. यावेळी उपस्थितांची मने भारावून गेली होती. वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्यपथक, शिवसाम्राज्य वाद्यपथक, शिववर्धन वाद्यपथक यांच्या वतीने ही मुलाखत घेण्यात आली. मुलाखती पूर्वी त्यांची तुलाही करण्यात आली. यावेळी त्यांनी तरुण पिढीचंही भरभरून कौतुक केलं. 'तरुण पिढी कलाक्षेत्रात खूप चांगलं काम करत आहेत. कधीकधी तर मला त्यांचा हेवा सुद्धा वाटतो. पण या पिढीच्या सर्जनशील कामाबद्दल आनंद देखील तेवढाच आहे', असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मात्र फ्युजन म्हणजे नक्की काय असतं? फ्युजनचा अर्थ मला कळलेलाच नाही, असंही ते म्हणाले.
'वय हा एक आकडा असतो केवळ. मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. मी अजून १८ वर्षाचाच आहे. आताच तर कुठे माझी सुरुवात झालीय, असंच मी मानतो. मला पुण्याने खूप काही दिलं. पण मला ८० वर्षांचे म्हणू नका... मी स्वतःला आजही तरुणच समजतो', अशी मिश्किल टिप्पणी करतानाच पुढच्या जन्मीसुद्धा संगीताची सेवा करू इच्छितो, असं ते म्हणाले. तर पुण्यात कधीही कलियुग येणार नाही अशी माझी खात्री आहे. पुण्याच्या मातीत स्वर-लय जात्याच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बासरी वादन हा उत्तम योगाभ्यास
'बासरी एकेकाळी यात्रेत मिळायची. आज तिचा रियाज केला जातो, हे महत्त्वाचे आहे. हे वाद्य शिकायला प्रचंड मेहनत लागते. दिसायला जेवढे साधेसोपे तेवढेच आव्हानात्मक वाद्य आहे हे. बासरी लयीत वाजवणे मोठे कठीण असते. बासरी वादन हा उत्तम योगाभ्यास देखील आहे', असंही त्यांनी सांगितलं. 'मला संगीत शिकायचं होतं. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे महागडं वाद्य मी घेऊ शकत नव्हतो. सतार, सरोद घेणं अशक्य होतं. मग मी बासरी निवडली. ती अवघ्या दोन रुपयांना मिळायची. मला वाटतं की कला महत्त्वाची. त्यात महाग किंवा स्वस्त वाद्य हे फार महत्त्वाचं ठरत नाही. कलेची साधना महत्त्वाची. मी त्याच बळावर आजवर प्रवास करू शकलो. संगणक आणि इंटरनेटचं जग हे कमर्शियल आहे. संगीत असं शिकलं जात नाही. खरं संगीत शिकण्यासाठी गुरू आणि खडतर साधनाच हवी', असा कानमंत्रही त्यांनी दिला.
'आजच्या काळातील चित्रपटांपासून दूर राहिलेलेच बरे. काय हे आजच्या काळातील चित्रपट? पण 'बैजू बावरा' आणि 'मुघले आजम'सारख्या चित्रपटांची निर्मिती होणार असेल तर अशा चित्रपटांना संगीत द्यायला मला नक्की आवडेल. अशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना संगीत देण्याचा प्रयोग मी पुन्हा करेन'. हे उद्गार आहेत ज्येष्ठ बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे. चौरसिया यांनी वयाची ऐंशी गाठली आहे. त्यानिमित्त घेण्यात आलेल्या मुलाखतीत त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली.
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनी या मुलाखतीत त्यांचा जीवन प्रवास उलगडवू दाखवला. यावेळी उपस्थितांची मने भारावून गेली होती. वंदेमातरम् संघटनेचे युवा वाद्यपथक, शिवसाम्राज्य वाद्यपथक, शिववर्धन वाद्यपथक यांच्या वतीने ही मुलाखत घेण्यात आली. मुलाखती पूर्वी त्यांची तुलाही करण्यात आली. यावेळी त्यांनी तरुण पिढीचंही भरभरून कौतुक केलं. 'तरुण पिढी कलाक्षेत्रात खूप चांगलं काम करत आहेत. कधीकधी तर मला त्यांचा हेवा सुद्धा वाटतो. पण या पिढीच्या सर्जनशील कामाबद्दल आनंद देखील तेवढाच आहे', असे गौरवोद्गार त्यांनी काढले. मात्र फ्युजन म्हणजे नक्की काय असतं? फ्युजनचा अर्थ मला कळलेलाच नाही, असंही ते म्हणाले.
'वय हा एक आकडा असतो केवळ. मी त्याकडे फारसे लक्ष देत नाही. मी अजून १८ वर्षाचाच आहे. आताच तर कुठे माझी सुरुवात झालीय, असंच मी मानतो. मला पुण्याने खूप काही दिलं. पण मला ८० वर्षांचे म्हणू नका... मी स्वतःला आजही तरुणच समजतो', अशी मिश्किल टिप्पणी करतानाच पुढच्या जन्मीसुद्धा संगीताची सेवा करू इच्छितो, असं ते म्हणाले. तर पुण्यात कधीही कलियुग येणार नाही अशी माझी खात्री आहे. पुण्याच्या मातीत स्वर-लय जात्याच आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
बासरी वादन हा उत्तम योगाभ्यास
'बासरी एकेकाळी यात्रेत मिळायची. आज तिचा रियाज केला जातो, हे महत्त्वाचे आहे. हे वाद्य शिकायला प्रचंड मेहनत लागते. दिसायला जेवढे साधेसोपे तेवढेच आव्हानात्मक वाद्य आहे हे. बासरी लयीत वाजवणे मोठे कठीण असते. बासरी वादन हा उत्तम योगाभ्यास देखील आहे', असंही त्यांनी सांगितलं. 'मला संगीत शिकायचं होतं. घरची परिस्थिती बेताची होती. त्यामुळे महागडं वाद्य मी घेऊ शकत नव्हतो. सतार, सरोद घेणं अशक्य होतं. मग मी बासरी निवडली. ती अवघ्या दोन रुपयांना मिळायची. मला वाटतं की कला महत्त्वाची. त्यात महाग किंवा स्वस्त वाद्य हे फार महत्त्वाचं ठरत नाही. कलेची साधना महत्त्वाची. मी त्याच बळावर आजवर प्रवास करू शकलो. संगणक आणि इंटरनेटचं जग हे कमर्शियल आहे. संगीत असं शिकलं जात नाही. खरं संगीत शिकण्यासाठी गुरू आणि खडतर साधनाच हवी', असा कानमंत्रही त्यांनी दिला.