म. टा. प्रतिनिधी, पुणे
भविष्यात सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. पोलिसांकडून अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले सुरू आहेत. पुणेकरांना सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक देण्यासाठी येत्या वर्षात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रसंगी कठोर निर्णयदेखील घेतले जातील,' अशी भूमिका पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी नुकतीच मांडली.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'मटा संवाद' कार्यक्रमात पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यांचा आढावा घेऊन आणि आगामी काळात पोलिसांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. बदलत्या काळानुसार पोलिसांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्यामध्ये काही बदल करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
'भविष्यात खून, मारामारी, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. तर, सायबर व आर्थिक गुन्हे झपाट्याने वाढत जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर असे लक्षात येते की, केवळ पुण्यामध्येच नव्हे; तर संपूर्ण देशभरात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट होत आहे. नवनवीन पद्धतीने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच, अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी 'लर्निंग सेंटर'देखील सुरू करण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे सुरू केले आहे. या पोलिस ठाण्याचे काम राज्यात सर्वांत चांगले ठरल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणारी फसवणूक कमी व्हावी यासाठी नागरिकांनी नक्की काय काळजी घेतली पाहिजे, कोणती माहिती देता कामा नये, यासाठी नागरिकांमध्ये पोलिसांच्या वतीने सतत जनजागृती केली जात आहे,' आयुक्त व्यंकटेशम् यांनी स्पष्ट केले.
-----
'पुणेकर चांगल्या कामाच्या पाठीशी'
'नागपूरमध्ये पोलिस आयुक्त म्हणून काम करताना जे प्रयोग केले; तसेच प्रयोग पुणे पोलिस आयुक्तालयाची सूत्रे घेतल्यानंतर केले. येथे मिळालेला प्रतिसाद हा नागपूरपेक्षा हजारपटीने अधिक आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. 'पुणेकर प्रत्येक बाबतीत सतर्क आहे. चांगल्या गोष्टींचे सतत कौतुक करतात, मदतीसाठी पुढे येतात. चुकीचे काही असेल तर लपवून ठेवत नाहीत, बिनधास्तपणे सांगतात. प्रसंगी नक्की काय केले पाहिजे, याचा सल्लाही देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. पोलिसांकडून अपेक्षा काय यासाठी पुणेकरांकडून सूचना मागविल्या असता त्याला प्रतिसाद देऊन तब्बल ८५१ सूचना नागरिकांकडून करण्यात आल्या,' असे पोलिस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांनी सांगितले.
०००००
'वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत'
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून आजही आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामी शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक ही भूमिका घेऊन पोलिसांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. वाहतुकीला शिस्त लागावी आणि नियम तोडणाऱ्यांना धडा मिळावा, यासाठी ऑनलाइन दंडाची सिस्टीम आणण्याचा प्रयत्न आहे. प्रगतशील देशात वाहतुकीच्या नियमनासाठी ही अद्ययावत यंत्रणा वापरली जाते. वाहतुकीच्या नियमांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी रस्त्यावरील अपघातांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त व्यंकटेशम् यांनी केला.
०००००
ठळक मुद्दे
वाहतुकीसाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार
उघडकीस न आलेल्या खुनांच्या गुन्ह्यांचा आढावा घेणार
महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष देणार
पुण्यासाठी पार्किंग धोरण आवश्यक
आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना
भविष्यात सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ होणार आहे. पोलिसांकडून अत्याधुनिक पद्धतीचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न केले सुरू आहेत. पुणेकरांना सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक देण्यासाठी येत्या वर्षात आवश्यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. प्रसंगी कठोर निर्णयदेखील घेतले जातील,' अशी भूमिका पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी नुकतीच मांडली.
'महाराष्ट्र टाइम्स'च्या पुणे आवृत्तीच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित 'मटा संवाद' कार्यक्रमात पोलिस आयुक्त व्यंकटेशम यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी शहरातील कायदा आणि सुव्यवस्था यांचा आढावा घेऊन आणि आगामी काळात पोलिसांच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. बदलत्या काळानुसार पोलिसांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्यामध्ये काही बदल करण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
'भविष्यात खून, मारामारी, जबरी चोरी, घरफोडी अशा गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होणार आहे. तर, सायबर व आर्थिक गुन्हे झपाट्याने वाढत जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली, तर असे लक्षात येते की, केवळ पुण्यामध्येच नव्हे; तर संपूर्ण देशभरात गंभीर गुन्ह्यांमध्ये घट होत आहे. नवनवीन पद्धतीने नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर राहणार आहे. सायबर गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आयटी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तसेच, अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी 'लर्निंग सेंटर'देखील सुरू करण्यात आली आहेत. सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी स्वतंत्र सायबर पोलिस ठाणे सुरू केले आहे. या पोलिस ठाण्याचे काम राज्यात सर्वांत चांगले ठरल्याचे दिसून आले आहे. ऑनलाइन पद्धतीने होणारी फसवणूक कमी व्हावी यासाठी नागरिकांनी नक्की काय काळजी घेतली पाहिजे, कोणती माहिती देता कामा नये, यासाठी नागरिकांमध्ये पोलिसांच्या वतीने सतत जनजागृती केली जात आहे,' आयुक्त व्यंकटेशम् यांनी स्पष्ट केले.
-----
'पुणेकर चांगल्या कामाच्या पाठीशी'
'नागपूरमध्ये पोलिस आयुक्त म्हणून काम करताना जे प्रयोग केले; तसेच प्रयोग पुणे पोलिस आयुक्तालयाची सूत्रे घेतल्यानंतर केले. येथे मिळालेला प्रतिसाद हा नागपूरपेक्षा हजारपटीने अधिक आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. 'पुणेकर प्रत्येक बाबतीत सतर्क आहे. चांगल्या गोष्टींचे सतत कौतुक करतात, मदतीसाठी पुढे येतात. चुकीचे काही असेल तर लपवून ठेवत नाहीत, बिनधास्तपणे सांगतात. प्रसंगी नक्की काय केले पाहिजे, याचा सल्लाही देण्यास मागे पुढे पाहत नाहीत. पोलिसांकडून अपेक्षा काय यासाठी पुणेकरांकडून सूचना मागविल्या असता त्याला प्रतिसाद देऊन तब्बल ८५१ सूचना नागरिकांकडून करण्यात आल्या,' असे पोलिस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् यांनी सांगितले.
०००००
'वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीत'
शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली असून आजही आपल्याकडे वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. परिणामी शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक ही भूमिका घेऊन पोलिसांनी काम करण्यास सुरुवात केली आहे. वाहतुकीला शिस्त लागावी आणि नियम तोडणाऱ्यांना धडा मिळावा, यासाठी ऑनलाइन दंडाची सिस्टीम आणण्याचा प्रयत्न आहे. प्रगतशील देशात वाहतुकीच्या नियमनासाठी ही अद्ययावत यंत्रणा वापरली जाते. वाहतुकीच्या नियमांबाबत केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी रस्त्यावरील अपघातांची संख्या १९ टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती पोलिस आयुक्त व्यंकटेशम् यांनी केला.
०००००
ठळक मुद्दे
वाहतुकीसाठी अॅक्शन प्लॅन तयार करणार
उघडकीस न आलेल्या खुनांच्या गुन्ह्यांचा आढावा घेणार
महिला सुरक्षेकडे विशेष लक्ष देणार
पुण्यासाठी पार्किंग धोरण आवश्यक
आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना