म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत, भविष्यात दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत,’ अशी अपेक्षा इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमन यांनी व्यक्त केली.
भारत- इस्रायल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत- इस्रायल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त अभय फिरोदिया, इस्रायलचे व्यापार प्रतिनिधी डेव्हिड अॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते. कारमन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे होते; मात्र गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना दिसून येत आहे. नजीकच्या भविष्यात याच क्षेत्रांमध्ये संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्रायल सरकार करणार असून, भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल,’ असा विश्वास आहे.
‘भारत सरकारच्या मदतीने शेती व्यवस्थापनात इस्रायल आणखी भरीव क्रांती करू इच्छित आहे. त्यासाठी भारतात विविध ठिकाणी एक्सलन्स सेंटरची उभारणी करण्याचा मानस असून महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा या ठिकाणी ही सेंटर्स सुरू होत आहेत. येथील विविध राज्यांशी संबंध वाढविणेही देखील गरजेचे असून गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राशी आमचे सकारात्मक संबंध प्रस्थापित झाले आहेत,’ असेही कारमन यांनी नमूद केले.
‘इस्रायलमधील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी १० टक्के आहेत. येत्या काही आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
‘भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश एकमेकांना पूरक आहेत, भविष्यात दोन्ही देशांनी आपले संबंध आणखी दृढ करावेत,’ अशी अपेक्षा इस्रायलचे भारतातील राजदूत डॅनियल कारमन यांनी व्यक्त केली.
भारत- इस्रायल या दोन देशांतील संबंधांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘भारत- इस्रायल, २५ वर्षीय संबंधांचा आढावा आणि भविष्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, विश्वस्त अभय फिरोदिया, इस्रायलचे व्यापार प्रतिनिधी डेव्हिड अॅकॉफ, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते. कारमन म्हणाले, ‘सुरुवातीला दोन्ही देशातील संबंध हे सामरिकदृष्ट्या अधिक महत्त्वाचे होते; मात्र गेल्या काही वर्षांत शेती, व्यापार, शैक्षणिक संबंध, सायबर सुरक्षा, तंत्रज्ञान, आरोग्य, उद्योजकता आणि अन्नसुरक्षा आदी क्षेत्रांतही ते मोठ्या प्रमाणात प्रस्थापित होताना दिसून येत आहे. नजीकच्या भविष्यात याच क्षेत्रांमध्ये संबंध आणखी वाढविण्याचा प्रयत्न इस्रायल सरकार करणार असून, भारत सरकारही त्याला सकारात्मक प्रतिसाद देईल,’ असा विश्वास आहे.
‘भारत सरकारच्या मदतीने शेती व्यवस्थापनात इस्रायल आणखी भरीव क्रांती करू इच्छित आहे. त्यासाठी भारतात विविध ठिकाणी एक्सलन्स सेंटरची उभारणी करण्याचा मानस असून महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा या ठिकाणी ही सेंटर्स सुरू होत आहेत. येथील विविध राज्यांशी संबंध वाढविणेही देखील गरजेचे असून गेल्या अनेक वर्षांत महाराष्ट्राशी आमचे सकारात्मक संबंध प्रस्थापित झाले आहेत,’ असेही कारमन यांनी नमूद केले.
‘इस्रायलमधील परदेशी विद्यार्थ्यांमध्ये भारतीय विद्यार्थी १० टक्के आहेत. येत्या काही आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणार आहेत. या भेटीत पुन्हा या दोन्ही देशांचे संबंध आणखी वाढतील,’ अशी आशा त्यांनी व्यक्त केली.