म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिरता, सुरक्षा, प्रगती आणि मजबूत सरकारचे प्रतीक आहेत. सुशासनाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असून, ते पूर्ण करण्यासाठीच देशाला पुन्हा 'मोदी सरकार'ची गरज आहे,' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. आघाड्यांच्या अल्पकालीन सरकारमध्ये देशाची प्रगती खुंटल्याने देशाला पूर्ण बहुमताचे सरकार हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी कोथरूड येथे आयोजित पहिल्या प्रचारसभेत जावडेकर बोलत होते. काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेवर सडकून टीका करतानाच, देशाला पुन्हा पंतप्रधान म्हणून मोदींचीच गरज असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. 'काँग्रेसने गरिबांसाठी कायमच मोठमोठ्या योजना जाहीर केल्या; पण गरिबी दूर झाली नाही. मोदी सरकारने गरिबी नाहीशी होण्यासाठी समृद्धी निर्माण करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. काँग्रेसने तुकड्या-तुकड्यांमध्ये गरिबी वाटली, तर आम्ही समृद्धी वाटून गरिबी नामशेष करण्यासाठी झटतो आहोत', असा दावा त्यांनी केला. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांना पुन्हा मोदीच हवे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, 'आरपीआय'चे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह रासप, शिवसंग्राम यांचे पदाधिकारी आणि भाजपचे स्थानिक नगरसेवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'गेल्या वेळपेक्षा अधिक मोठा विजय मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे', असा संदेश देतानाच, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, अशी कामगिरी करा, असा सल्ला खासदार अनिल शिरोळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. गेल्या वेळी लाट असेल, तर या वेळी जनशक्तीची त्सुनामी असल्याचे दाखवून द्या, असेही त्यांनी सांगितले. फक्त पुण्यातूनच नाही, तर पुणे जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला उणे करायचा निर्धार महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केला असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
.................
शिरोळेंचे कौतुक
एखाद्या विद्यमान खासदाराला पुन्हा उमेदवारी मिळाली नाही, तर कोणत्याही पक्षात भांडणे होतात, मारामारी होते; परंतु पुण्यात खासदार शिरोळे त्यांची 'बॅटन' अगदी सहज बापट यांच्याकडे सोपवितात आणि त्यांच्या प्रचारात सहभागी होतात. या प्रवृत्तीसाठी शिरोळे यांचे अभिनंदन करायला हवे, अशा शब्दांत जावडेकर यांनी खासदार अनिल शिरोळेंची स्तुती केली.
..................
भाषणे लांबल्याने गर्दी ओसरली
कोथरूड या पारंपरिक मतदारसंघात गिरीश बापट यांच्यासाठी पहिली प्रचारसभा घेण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु, व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांची भाषणे लांबत गेल्याने काही नागरिकांनी जावडेकर यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे इतर नेत्यांच्या भाषणाला गर्दीने भरून गेलेले मैदान जावडेकरांचे भाषण सुरू असतनाच, मागील बाजूस रिकामे झाले होते.
....................
'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्थिरता, सुरक्षा, प्रगती आणि मजबूत सरकारचे प्रतीक आहेत. सुशासनाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू असून, ते पूर्ण करण्यासाठीच देशाला पुन्हा 'मोदी सरकार'ची गरज आहे,' असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. आघाड्यांच्या अल्पकालीन सरकारमध्ये देशाची प्रगती खुंटल्याने देशाला पूर्ण बहुमताचे सरकार हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांच्या प्रचारासाठी कोथरूड येथे आयोजित पहिल्या प्रचारसभेत जावडेकर बोलत होते. काँग्रेसच्या नेत्यांच्या भूमिकेवर सडकून टीका करतानाच, देशाला पुन्हा पंतप्रधान म्हणून मोदींचीच गरज असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. 'काँग्रेसने गरिबांसाठी कायमच मोठमोठ्या योजना जाहीर केल्या; पण गरिबी दूर झाली नाही. मोदी सरकारने गरिबी नाहीशी होण्यासाठी समृद्धी निर्माण करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. काँग्रेसने तुकड्या-तुकड्यांमध्ये गरिबी वाटली, तर आम्ही समृद्धी वाटून गरिबी नामशेष करण्यासाठी झटतो आहोत', असा दावा त्यांनी केला. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांना पुन्हा मोदीच हवे असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, आमदार विजय काळे, मेधा कुलकर्णी, माधुरी मिसाळ, शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेनेचे माजी मंत्री शशिकांत सुतार, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, शिवसेना शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, 'आरपीआय'चे शहराध्यक्ष अशोक कांबळे यांच्यासह रासप, शिवसंग्राम यांचे पदाधिकारी आणि भाजपचे स्थानिक नगरसेवक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'गेल्या वेळपेक्षा अधिक मोठा विजय मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे', असा संदेश देतानाच, विरोधी पक्षाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल, अशी कामगिरी करा, असा सल्ला खासदार अनिल शिरोळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. गेल्या वेळी लाट असेल, तर या वेळी जनशक्तीची त्सुनामी असल्याचे दाखवून द्या, असेही त्यांनी सांगितले. फक्त पुण्यातूनच नाही, तर पुणे जिल्ह्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला उणे करायचा निर्धार महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केला असल्याचे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.
.................
शिरोळेंचे कौतुक
एखाद्या विद्यमान खासदाराला पुन्हा उमेदवारी मिळाली नाही, तर कोणत्याही पक्षात भांडणे होतात, मारामारी होते; परंतु पुण्यात खासदार शिरोळे त्यांची 'बॅटन' अगदी सहज बापट यांच्याकडे सोपवितात आणि त्यांच्या प्रचारात सहभागी होतात. या प्रवृत्तीसाठी शिरोळे यांचे अभिनंदन करायला हवे, अशा शब्दांत जावडेकर यांनी खासदार अनिल शिरोळेंची स्तुती केली.
..................
भाषणे लांबल्याने गर्दी ओसरली
कोथरूड या पारंपरिक मतदारसंघात गिरीश बापट यांच्यासाठी पहिली प्रचारसभा घेण्यात आली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. परंतु, व्यासपीठावरील उपस्थित नेत्यांची भाषणे लांबत गेल्याने काही नागरिकांनी जावडेकर यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच सभेतून काढता पाय घेतला. त्यामुळे इतर नेत्यांच्या भाषणाला गर्दीने भरून गेलेले मैदान जावडेकरांचे भाषण सुरू असतनाच, मागील बाजूस रिकामे झाले होते.
....................