अ‍ॅपशहर

‘महिला, मुलींसाठी भारत असुरक्षित’

पुणे : ‘मी अनेक वेळा परदेशात एकटी जाते. परदेशात एकटे असताना कोणतीही भिती वाटत नाही. मात्र, मला भारतात एकटे फिरायचे असेल तर जाता येत नाही. एकंदरीतच देशातील सध्याचे वातावरण महिलांसाठी सुरक्षित नाही,’ असे सांगत प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.पूना गेस्ट हाउस येथे आयोजित केलेल्या ‘स्नेह मंच’ या कार्यक्रमात सुलभा तेरणीकर यांनी राधा मंगेशकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी मंगेशकर यांनी ‘महिला सुरक्षेची समस्या देशात दिवसेंदिवस वाढत असून महिला एकट्या फिरू शकत नाहीत,’ अशी खंत व्यक्त केली. ‘परदेशात महिलांना एकटे फिरताना सुरक्षित वाटते. मात्र, भारतात तशी परिस्थिती नाही. मला बिहारमध्ये बोधगया येथे जायचे असेल तर एकटीला जाता येत नाही. अशा वेळी देशीतील वातावरण असुरक्षित असल्याचे वारंवार दिसून येते,’ असे मंगेशकर यांनी सांगितले.संगीताविषयी बोलताना मंगेशकर म्हणाल्या, ‘आपले राष्ट्रगीत ‘जन गण मन’, ‘शांती निकेतन’ आणि ‘विश्व परिचय’ या पलीकडे रवींद्रनाथ टागोर आपणास माहित नाहीत. भारतीय संगीतामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते रवींद्र संगीत म्हणून कोलकाता व पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहेत. रविंद्र संगीतातील नियम आणि अटी अनेक गायकांना मान्य नसतात, त्यामुळे रवींद्र संगीताकडे कोणी वळत नाही. खरे तर रवींद्र संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ते १३० वर्ष जुने आहे. मी ते ऐकत गेले आणि मला ते आवडत गेले. बंगाली संगीतामध्ये रवींद्र संगीत हे एक तत्त्वज्ञान आहे. ते सरळ आणि सोपे नाही. त्यामुळे गायक तिकडे वळत नाहीत.’ ‘वडिलांना पंडितजी म्हणते’मंगेशकर यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘माझ्या वडिलांना मी पंडितजीच म्हणते. त्यांच्यामुळे मला शिरीष पै, कवी ग्रेस, राम शेवाळकर, शांता शेळके, सुरेश भट या दिग्गजांचा सहवास मिळाला. तर लतादीदींमुळे मला मोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली. लता मंगेशकरांना समजून घेण्यासाठी त्यांची गाणी ऐकणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Maharashtra Times 17 May 2017, 11:29 am
पुणे : ‘मी अनेक वेळा परदेशात एकटी जाते. परदेशात एकटे असताना कोणतीही भिती वाटत नाही. मात्र, मला भारतात एकटे फिरायचे असेल तर जाता येत नाही. एकंदरीतच देशातील सध्याचे वातावरण महिलांसाठी सुरक्षित नाही,’ असे सांगत प्रसिद्ध गायिका राधा मंगेशकर यांनी महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम india unsafe for women and girls
‘महिला, मुलींसाठी भारत असुरक्षित’


पूना गेस्ट हाउस येथे आयोजित केलेल्या ‘स्नेह मंच’ या कार्यक्रमात सुलभा तेरणीकर यांनी राधा मंगेशकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी मंगेशकर यांनी ‘महिला सुरक्षेची समस्या देशात दिवसेंदिवस वाढत असून महिला एकट्या फिरू शकत नाहीत,’ अशी खंत व्यक्त केली. ‘परदेशात महिलांना एकटे फिरताना सुरक्षित वाटते. मात्र, भारतात तशी परिस्थिती नाही. मला बिहारमध्ये बोधगया येथे जायचे असेल तर एकटीला जाता येत नाही. अशा वेळी देशीतील वातावरण असुरक्षित असल्याचे वारंवार दिसून येते,’ असे मंगेशकर यांनी सांगितले.

संगीताविषयी बोलताना मंगेशकर म्हणाल्या, ‘आपले राष्ट्रगीत ‘जन गण मन’, ‘शांती निकेतन’ आणि ‘विश्व परिचय’ या पलीकडे रवींद्रनाथ टागोर आपणास माहित नाहीत. भारतीय संगीतामध्ये त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी संगीतबद्ध केलेली गीते रवींद्र संगीत म्हणून कोलकाता व पश्चिम बंगालमध्ये प्रसिद्ध आहेत. रविंद्र संगीतातील नियम आणि अटी अनेक गायकांना मान्य नसतात, त्यामुळे रवींद्र संगीताकडे कोणी वळत नाही. खरे तर रवींद्र संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. ते १३० वर्ष जुने आहे. मी ते ऐकत गेले आणि मला ते आवडत गेले. बंगाली संगीतामध्ये रवींद्र संगीत हे एक तत्त्वज्ञान आहे. ते सरळ आणि सोपे नाही. त्यामुळे गायक तिकडे वळत नाहीत.’

‘वडिलांना पंडितजी म्हणते’

मंगेशकर यांनी त्यांच्या लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘माझ्या वडिलांना मी पंडितजीच म्हणते. त्यांच्यामुळे मला शिरीष पै, कवी ग्रेस, राम शेवाळकर, शांता शेळके, सुरेश भट या दिग्गजांचा सहवास मिळाला. तर लतादीदींमुळे मला मोठ्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळाली. लता मंगेशकरांना समजून घेण्यासाठी त्यांची गाणी ऐकणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज