म. टा. प्रतिनिधी, येरवडा
तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडण्यासाठी प्रशासनाकडून कैद्यांसाठी ‘गळाभेट’ कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. तुरुंगात मुलांना भेटल्यामुळे कैद्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होत असल्याने शिक्षेच्या काळात त्यांच्यात परिवर्तन होऊ लागले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून तो भविष्यात सुरू राहील, असे आश्वासन कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले.
येरवडा तुरुंगात पाच, दहा, चौदा वर्षे आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी प्रशासनाकडून शनिवारी पुन्हा एकदा ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दोनशे कैद्यांनी आपल्या मुलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून हाताने घास भरविले. गेल्या वर्षभरात येरवडा तुरुंग प्रशासनाकडून चौथ्यांदा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
रागाच्या भरात, सूड घेण्याच्या नादात हातून अपराध घडून तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगताना जीवनात खूप मोठी चूक केल्याचे वास्तव कैद्यांच्या लक्षात येते. तुरुंगात आपल्या मुलांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे कैद्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या लहान मुलांना देखील रडू आवरले नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक अडचण निर्माण असेल, तसेच संबंधित कैद्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केल्यास नक्कीच मदत केली जाईल,’ असे उपाध्याय यांनी सांगितले. या वेळी कैदी आणि त्यांच्या मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अधीक्षक पवार, उपधीक्षक दिलीप वासनिक, कौस्तुभ कुर्लेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर खरात आणि अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
मुलांना भरवले घास…
तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी एक वर्षाच्या लहान बाळापासून शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणारी मुले मोठ्या संख्येने आली होती. या वेळी वडिलांनी तुरुंगात काम करून कमावलेल्या पैशातून तुरुंगातील कँटीनमधून सोनपापडी, केक, चॉकलेट, फरसाण आणि फळे मोठ्या प्रमाणात खरेदी केली. कैद्यांनी भेटण्यासाठी आलेल्या मुलांना मांडीवर बसवून हाताने घास भरवले.
रडतच मानले आभार
‘गळाभेट’ कार्यक्रमादरम्यान अनेक कैद्यांच्या मुलांनी व्यासपीठावर येऊन तुरुंग प्रशासनाचे आभार मानले. या वेळी सर्वच मुले भावूक झाल्याने डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काही मुलांनी वडिलांची शिक्षा कमी करण्याची विनंती देखील अधिकाऱ्यांना केली.
तुरुंगात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांच्या मानसिकतेत बदल घडण्यासाठी प्रशासनाकडून कैद्यांसाठी ‘गळाभेट’ कार्यक्रम चालू करण्यात आला आहे. तुरुंगात मुलांना भेटल्यामुळे कैद्यांमध्ये प्रेमाची भावना निर्माण होत असल्याने शिक्षेच्या काळात त्यांच्यात परिवर्तन होऊ लागले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व तुरुंगांमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला असून तो भविष्यात सुरू राहील, असे आश्वासन कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिले.
येरवडा तुरुंगात पाच, दहा, चौदा वर्षे आणि जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांसाठी प्रशासनाकडून शनिवारी पुन्हा एकदा ‘गळाभेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे दोनशे कैद्यांनी आपल्या मुलांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारून हाताने घास भरविले. गेल्या वर्षभरात येरवडा तुरुंग प्रशासनाकडून चौथ्यांदा हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
रागाच्या भरात, सूड घेण्याच्या नादात हातून अपराध घडून तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगताना जीवनात खूप मोठी चूक केल्याचे वास्तव कैद्यांच्या लक्षात येते. तुरुंगात आपल्या मुलांना प्रत्यक्ष भेटल्यामुळे कैद्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या लहान मुलांना देखील रडू आवरले नाही.
मुलांच्या शिक्षणासाठी काही आर्थिक अडचण निर्माण असेल, तसेच संबंधित कैद्यांनी प्रशासनाकडे मदतीची विनंती केल्यास नक्कीच मदत केली जाईल,’ असे उपाध्याय यांनी सांगितले. या वेळी कैदी आणि त्यांच्या मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अधीक्षक पवार, उपधीक्षक दिलीप वासनिक, कौस्तुभ कुर्लेकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर खरात आणि अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.
मुलांना भरवले घास…
तुरुंगातील शिक्षा भोगत असलेल्या वडिलांना भेटण्यासाठी एक वर्षाच्या लहान बाळापासून शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणारी मुले मोठ्या संख्येने आली होती. या वेळी वडिलांनी तुरुंगात काम करून कमावलेल्या पैशातून तुरुंगातील कँटीनमधून सोनपापडी, केक, चॉकलेट, फरसाण आणि फळे मोठ्या प्रमाणात खरेदी केली. कैद्यांनी भेटण्यासाठी आलेल्या मुलांना मांडीवर बसवून हाताने घास भरवले.
रडतच मानले आभार
‘गळाभेट’ कार्यक्रमादरम्यान अनेक कैद्यांच्या मुलांनी व्यासपीठावर येऊन तुरुंग प्रशासनाचे आभार मानले. या वेळी सर्वच मुले भावूक झाल्याने डोळ्यांतून अश्रू वाहत होते. काही मुलांनी वडिलांची शिक्षा कमी करण्याची विनंती देखील अधिकाऱ्यांना केली.