prasad.panse@timesgroup.com
@PrasadPanseMT
पुणे : भारतीय नौदलात आयएनएस 'विराट'ने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. अमेरिका, इंग्लंड, जपानमध्ये त्यांच्या युद्धनौकांचे निवृत्तीनंतर उत्तमरीत्या जतन करण्यात आले आहे. भारतातच मात्र, सरकारी अनास्थेमुळे आपल्याला आयएनएस विक्रांत भंगारात काढावी लागली. आता 'विराट'ही त्याच मार्गावर असल्याचे चित्र अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया देऊन नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यांनी 'विराट'चे जतन झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.
नौदलातून निवृत्त होऊन वर्ष उलटले, तरी 'विराट'चे भवितव्य अजूनही निश्चित झालेले नाही. 'विराट'साठी आंध्र प्रदेश सरकारने रस दाखवला असला, तरी नौदलाने अजून हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास 'विराट' भंगारात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नौदलाच्या इतिहासातील अनमोल ठेवा गमावण्याची भीती आहे. नौदल मुख्यालयाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या माहितीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. त्याबाबतचे वृत्त बुधवारी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर निवृत्त नौदल अधिकाऱ्यांनी 'मटा'शी संवाद साधताना 'विराट'विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
''विराट' निवृत्त झाल्यानंतर एक वर्ष होऊनही आपण 'विराट'च्या भवितव्याबद्दलचा निर्णय घेऊ शकलेलो नाही, ही बाब अत्यंत निराशाजनक व वेदनादायी आहे,' असे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल अरूण प्रकाश यांनी स्पष्ट केले. 'ही गोष्ट अगदीच अनपेक्षितही नाही. आपल्या युद्धनौका या आपल्या इतिहासाचे प्रतीक आहेत. त्या वाचवणे आवश्यकच आहे. यापूर्वी आपण आपली पहिली विमानवाहू युद्धनौका विक्रांत व अन्य युद्धनौका भंगारात काढल्या. आता 'विराट'ही भंगारात निघू नये. संरक्षण मंत्रालयाच्या इच्छाशक्तीशिवाय व परवानगीशिवाय काहीही करता येऊ शकत नाही,'अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, हे सर्व सरकारी इच्छाशक्तीवर अवलंबून आहे,' असे अॅडमिरल प्रकाश यांनी स्पष्ट केले.
''विराट'ने आपल्या नौदलात उत्तम कामगिरी बजावली. त्यावर संग्रहालय होणेच उचित आहे. मात्र, ही गोष्ट आपल्या हातात नाही. ती सरकारची जबाबदारी आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया येथे आहेत. अत्यंत सुंदर आहे. तिथे प्रचंड आदर आहे. 'भारतीय नौदलाच्या इतिहासात 'विराट'चे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्याचे संग्रहालयात रूपांतर होणेच आवश्यक आहे. अमेरिका, जपान इतकेच काय दक्षिण कोरियामध्येही निवृत्त युद्धनौकांचे सुंदर स्मारक किंवा संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. कारण, तिथे संरक्षण दलांबद्दल आदराची भावना आहे. त्याचदृष्टीने या निवृत्त युद्धनौकांकडेही पाहिले जाते. मात्र, ही गोष्ट आपल्या हातात नाही. संरक्षण मंत्रालयाचीच ती जबाबदारी आहे. तिथून लवकरात लवकर निर्णय होणे आवश्यक आहे,असे व्हाइस अॅडमिरल संजय वडगावकर यांनी सांगितले.
'विराट' ही अनेक वर्ष भारतीय नौदलातील एकमेव विमानवाहू युद्धनौका होती. 'विराट'चे योगदान लक्षात घेता त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संग्रहालय किंवा नौदल प्रशिक्षण केंद्रात रूपांतर असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय होणे आवश्यक आहे,' असे कमोडोर अजय चिटणीस (नि)यांनी सांगितले.
''विराट'बद्दल जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत नौदल तिची यथायोग्य देखभाल करत आहे. त्यासाठी जागा, देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळ व अन्य यंत्रणा गुंतलेल्या आहेत. फक्त त्यावरील काही यंत्रणा उतरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही युद्धनौका फक्त समुद्रात सैर करू शकणार नाही. मात्र, जितका अधिक काळ ही युद्धनौका वापराविना राहील, तितकी ती खराब होत जाईल व त्यामुळे ती भंगारात काढण्याशिवाय पर्यायच उरणार नाही, अशा दुष्टचक्रात 'विराट' सध्या अडकलेली आहे. 'विराट'चे संग्रहालय होईल,अशी भाबडी आशा आम्हाला आहे. तरीही 'विराट' भंगारात निघालीच तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही,' अशी प्रतिक्रिया 'विराट'वर काही काळ सेवा बजावलेल्या नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवली.
@PrasadPanseMT
पुणे : भारतीय नौदलात आयएनएस 'विराट'ने अत्यंत मोलाची कामगिरी बजावली आहे. अमेरिका, इंग्लंड, जपानमध्ये त्यांच्या युद्धनौकांचे निवृत्तीनंतर उत्तमरीत्या जतन करण्यात आले आहे. भारतातच मात्र, सरकारी अनास्थेमुळे आपल्याला आयएनएस विक्रांत भंगारात काढावी लागली. आता 'विराट'ही त्याच मार्गावर असल्याचे चित्र अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया देऊन नौदलातील निवृत्त अधिकाऱ्यांनी 'विराट'चे जतन झालेच पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे.
नौदलातून निवृत्त होऊन वर्ष उलटले, तरी 'विराट'चे भवितव्य अजूनही निश्चित झालेले नाही. 'विराट'साठी आंध्र प्रदेश सरकारने रस दाखवला असला, तरी नौदलाने अजून हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास 'विराट' भंगारात जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नौदलाच्या इतिहासातील अनमोल ठेवा गमावण्याची भीती आहे. नौदल मुख्यालयाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या माहितीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. त्याबाबतचे वृत्त बुधवारी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रकाशित झाले होते. त्यानंतर निवृत्त नौदल अधिकाऱ्यांनी 'मटा'शी संवाद साधताना 'विराट'विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
''विराट' निवृत्त झाल्यानंतर एक वर्ष होऊनही आपण 'विराट'च्या भवितव्याबद्दलचा निर्णय घेऊ शकलेलो नाही, ही बाब अत्यंत निराशाजनक व वेदनादायी आहे,' असे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल अरूण प्रकाश यांनी स्पष्ट केले. 'ही गोष्ट अगदीच अनपेक्षितही नाही. आपल्या युद्धनौका या आपल्या इतिहासाचे प्रतीक आहेत. त्या वाचवणे आवश्यकच आहे. यापूर्वी आपण आपली पहिली विमानवाहू युद्धनौका विक्रांत व अन्य युद्धनौका भंगारात काढल्या. आता 'विराट'ही भंगारात निघू नये. संरक्षण मंत्रालयाच्या इच्छाशक्तीशिवाय व परवानगीशिवाय काहीही करता येऊ शकत नाही,'अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र, हे सर्व सरकारी इच्छाशक्तीवर अवलंबून आहे,' असे अॅडमिरल प्रकाश यांनी स्पष्ट केले.
''विराट'ने आपल्या नौदलात उत्तम कामगिरी बजावली. त्यावर संग्रहालय होणेच उचित आहे. मात्र, ही गोष्ट आपल्या हातात नाही. ती सरकारची जबाबदारी आहे. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया येथे आहेत. अत्यंत सुंदर आहे. तिथे प्रचंड आदर आहे. 'भारतीय नौदलाच्या इतिहासात 'विराट'चे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर त्याचे संग्रहालयात रूपांतर होणेच आवश्यक आहे. अमेरिका, जपान इतकेच काय दक्षिण कोरियामध्येही निवृत्त युद्धनौकांचे सुंदर स्मारक किंवा संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे. कारण, तिथे संरक्षण दलांबद्दल आदराची भावना आहे. त्याचदृष्टीने या निवृत्त युद्धनौकांकडेही पाहिले जाते. मात्र, ही गोष्ट आपल्या हातात नाही. संरक्षण मंत्रालयाचीच ती जबाबदारी आहे. तिथून लवकरात लवकर निर्णय होणे आवश्यक आहे,असे व्हाइस अॅडमिरल संजय वडगावकर यांनी सांगितले.
'विराट' ही अनेक वर्ष भारतीय नौदलातील एकमेव विमानवाहू युद्धनौका होती. 'विराट'चे योगदान लक्षात घेता त्याचे रक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संग्रहालय किंवा नौदल प्रशिक्षण केंद्रात रूपांतर असे पर्याय उपलब्ध आहेत. त्याबाबत लवकरात लवकर निर्णय होणे आवश्यक आहे,' असे कमोडोर अजय चिटणीस (नि)यांनी सांगितले.
''विराट'बद्दल जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत नौदल तिची यथायोग्य देखभाल करत आहे. त्यासाठी जागा, देखभाल दुरुस्ती, मनुष्यबळ व अन्य यंत्रणा गुंतलेल्या आहेत. फक्त त्यावरील काही यंत्रणा उतरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही युद्धनौका फक्त समुद्रात सैर करू शकणार नाही. मात्र, जितका अधिक काळ ही युद्धनौका वापराविना राहील, तितकी ती खराब होत जाईल व त्यामुळे ती भंगारात काढण्याशिवाय पर्यायच उरणार नाही, अशा दुष्टचक्रात 'विराट' सध्या अडकलेली आहे. 'विराट'चे संग्रहालय होईल,अशी भाबडी आशा आम्हाला आहे. तरीही 'विराट' भंगारात निघालीच तर त्यासारखे दुसरे दुर्दैव नाही,' अशी प्रतिक्रिया 'विराट'वर काही काळ सेवा बजावलेल्या नौदलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने नोंदवली.