Karuna.Puri@timesgroup.com
Tweet : MTkarunapuri@
पुणे : कॉलेजला जाणारी एक मुलगी मामाने सुरू केलेला अंडाभुर्जीचा कौटुंबिक व्यवसाय हाती घेऊन तो यशस्वीपणे चालवते. काही वर्षांनी दुकानांची संख्या वाढवून 'शिवमल्हार' या नावाने आपल्या या घरगुती व्यवसायाची 'फ्रँचायझी'ही देते. हा सारा प्रवास रंजक आणि तितकाच मसालेदार आहे. प्रवासातील अडचणींवर मात करून अनेकांची अन्नपूर्णा बनलेल्या तरुणीचे नाव आहे...रूपाली जाधव.
तीन वर्षांपूर्वी 'कमिन्स कॉलेज'मधून 'बीसीए' करत असताना, रूपालीच्या मामाचे निधन झाले. त्यामुळे घरगुती व्यवसायाला पूर्णविराम मिळण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र, रूपालीला हे मान्य नव्हते. मामाने मोठ्या कष्टाने उभा केलेला व्यवसाय टिकवण्यासाठी तिने सगळी सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला विमलाबाई गरवारे शाळेच्या समोरच्या बसस्टॉपमागे 'शिवमल्हार' हे छोटेसे अंडाभुर्जी सेंटर तिने आईसोबत चालविण्याचा प्रयत्न केला. मदतीला मनुष्यबळ नसतानाही मायलेकींनी अंड्याच्या विविध पदार्थांची चव कायम ठेवून खवय्यांना खूश केले. सोबत तिचे 'एमबीए'चे शिक्षणही सुरू होते. कालांतराने प्रतिसाद वाढल्याने आर्थिक फायदा होऊ लागला; म्हणून रूपालीने खिलारेवाडी येथे अंडाभुर्जीचे दुसरे सेंटर सुरू केले. आता या दोन्ही ठिकाणी तिने मदतनीस ठेवले असून, दिवसभर ती याच व्यवसायात व्यग्र असते.
'मामा अशोक माझिरेने मोठ्या प्रयत्नाने सुरू केलेला व्यवसाय त्याच्या निधनानंतर बंद पडावा, हे मला पाहवले नाही. आईच्या सोबतीने सेंटर ताब्यात घेतले. आपल्याला जमेल का, लोक काय म्हणतील, मला मामाच्या हातची चव जमेल का, प्रतिसाद मिळेल का, मुलगी म्हणून हे काम करणे लोकांच्या नजरेत खुपेल का, असे अनेक प्रश्न होते. मात्र, आईने खंबीर साथ दिली आणि मी पदार्थ करण्याची जबाबदारी सांभाळली. पाहता पाहता व्यवसाय वाढला आणि आता दुसरी शाखाही कार्यरत आहे,' असे रूपालीने 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.
अंडाभुर्जीची गाडी म्हणजे खाण्याऱ्या-पिणाऱ्यांचा अड्डा, असे एक समीकरण असते. त्यामुळे तिथे कुटुंब किंवा मुलींचा वावर नसतो. रूपालीने मात्र हा समज खोडून काढला. एक मुलगी अंडाभुर्जीची गाडी सांभाळते आहे आणि तिच्या हातच्या पदार्थांची चव कमाल आहे, हे कळल्यानंतर अनेक मुली आणि कुटुंब तिथे गर्दी करतात. कुटुंबातील नवीन पिढीची उद्योजक म्हणून रूपालीला 'शिवमल्हार' हा अंडाभुर्जीचा 'ब्रँड' सर्वदूर पोहोचविण्याची इच्छा आहे. 'फ्रँचायझी' वाढवण्याच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्याने कार्यक्षेत्र वाढविण्याचाही तिचा विचार आहे.
कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो. कौटुंबिक व्यवसाय म्हटल्यावर त्यासोबत असणारी निष्ठा आणि आत्मीयता जपून तो वाढवण्याची जबाबदारी पुढच्या पिढीची असते. विशिष्ट व्यवसाय म्हणजे पुरुषांचे क्षेत्र, असा कोणताही भाव मनात ठेवण्याची मुलींना गरज नाही. मी तो कधीच ठेवला नाही. तो व्यवसाय आपलाच आहे, असे समजून त्यात उतरले पाहिजे. व्यवसाय करताना त्यामध्ये कमीपणा किंवा लाज बाळगता कामा नये.
- रूपाली जाधव
Tweet : MTkarunapuri@
पुणे : कॉलेजला जाणारी एक मुलगी मामाने सुरू केलेला अंडाभुर्जीचा कौटुंबिक व्यवसाय हाती घेऊन तो यशस्वीपणे चालवते. काही वर्षांनी दुकानांची संख्या वाढवून 'शिवमल्हार' या नावाने आपल्या या घरगुती व्यवसायाची 'फ्रँचायझी'ही देते. हा सारा प्रवास रंजक आणि तितकाच मसालेदार आहे. प्रवासातील अडचणींवर मात करून अनेकांची अन्नपूर्णा बनलेल्या तरुणीचे नाव आहे...रूपाली जाधव.
तीन वर्षांपूर्वी 'कमिन्स कॉलेज'मधून 'बीसीए' करत असताना, रूपालीच्या मामाचे निधन झाले. त्यामुळे घरगुती व्यवसायाला पूर्णविराम मिळण्याची स्थिती निर्माण झाली. मात्र, रूपालीला हे मान्य नव्हते. मामाने मोठ्या कष्टाने उभा केलेला व्यवसाय टिकवण्यासाठी तिने सगळी सूत्रे हाती घेतली. सुरुवातीला विमलाबाई गरवारे शाळेच्या समोरच्या बसस्टॉपमागे 'शिवमल्हार' हे छोटेसे अंडाभुर्जी सेंटर तिने आईसोबत चालविण्याचा प्रयत्न केला. मदतीला मनुष्यबळ नसतानाही मायलेकींनी अंड्याच्या विविध पदार्थांची चव कायम ठेवून खवय्यांना खूश केले. सोबत तिचे 'एमबीए'चे शिक्षणही सुरू होते. कालांतराने प्रतिसाद वाढल्याने आर्थिक फायदा होऊ लागला; म्हणून रूपालीने खिलारेवाडी येथे अंडाभुर्जीचे दुसरे सेंटर सुरू केले. आता या दोन्ही ठिकाणी तिने मदतनीस ठेवले असून, दिवसभर ती याच व्यवसायात व्यग्र असते.
'मामा अशोक माझिरेने मोठ्या प्रयत्नाने सुरू केलेला व्यवसाय त्याच्या निधनानंतर बंद पडावा, हे मला पाहवले नाही. आईच्या सोबतीने सेंटर ताब्यात घेतले. आपल्याला जमेल का, लोक काय म्हणतील, मला मामाच्या हातची चव जमेल का, प्रतिसाद मिळेल का, मुलगी म्हणून हे काम करणे लोकांच्या नजरेत खुपेल का, असे अनेक प्रश्न होते. मात्र, आईने खंबीर साथ दिली आणि मी पदार्थ करण्याची जबाबदारी सांभाळली. पाहता पाहता व्यवसाय वाढला आणि आता दुसरी शाखाही कार्यरत आहे,' असे रूपालीने 'महाराष्ट्र टाइम्स'ला सांगितले.
अंडाभुर्जीची गाडी म्हणजे खाण्याऱ्या-पिणाऱ्यांचा अड्डा, असे एक समीकरण असते. त्यामुळे तिथे कुटुंब किंवा मुलींचा वावर नसतो. रूपालीने मात्र हा समज खोडून काढला. एक मुलगी अंडाभुर्जीची गाडी सांभाळते आहे आणि तिच्या हातच्या पदार्थांची चव कमाल आहे, हे कळल्यानंतर अनेक मुली आणि कुटुंब तिथे गर्दी करतात. कुटुंबातील नवीन पिढीची उद्योजक म्हणून रूपालीला 'शिवमल्हार' हा अंडाभुर्जीचा 'ब्रँड' सर्वदूर पोहोचविण्याची इच्छा आहे. 'फ्रँचायझी' वाढवण्याच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्याने कार्यक्षेत्र वाढविण्याचाही तिचा विचार आहे.
कोणताही व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो. कौटुंबिक व्यवसाय म्हटल्यावर त्यासोबत असणारी निष्ठा आणि आत्मीयता जपून तो वाढवण्याची जबाबदारी पुढच्या पिढीची असते. विशिष्ट व्यवसाय म्हणजे पुरुषांचे क्षेत्र, असा कोणताही भाव मनात ठेवण्याची मुलींना गरज नाही. मी तो कधीच ठेवला नाही. तो व्यवसाय आपलाच आहे, असे समजून त्यात उतरले पाहिजे. व्यवसाय करताना त्यामध्ये कमीपणा किंवा लाज बाळगता कामा नये.
- रूपाली जाधव