पुणे: अतिवृष्टीचा फटका बसलेल्या पुणे शहरातील नागरिकांना १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून पंचनामे पूर्ण होताच या निधीचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा करतानाच त्याला निवडणूक आचारसंहितेचा कोणताही अडसर येणार नसल्याचं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं. तसेच पुणे जिल्ह्यातील पुरातील मृतांची संख्या २१ वर पोहोचली असून अजूनही सातजण बेपत्ता असल्याची माहिती राम यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थितीची माहिती देत झालेल्या नुकसानीचीही माहिती दिली. पुण्यात उद्यापासूनच पंचनामे सुरू करण्यात येणार आहे. पंचनाम्यासाठी पन्नास कुटुंबासाठी एक पथक राहणार आहे. प्रत्येक पथकात महापालिकेचे तीन अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी असणार आहेत. पंचनामे पूर्ण होताच निधीचा वाटप करण्यात येणार असून शहरी भागात पूरग्रस्तांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचंही राम यांनी सांगितलं. मदतीचे वाटप करण्यासाठी आचारसंहितेचा अडसर येणार नाही. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन निधी दिला जाणार आहे. फक्त धोरणात्मक निर्णय घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
>> ग्रामीण भागात खेडशिवापूर भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शहरामध्ये तांगेवाली कॉलनी भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.
>> नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामध्ये टीव्ही, वाहने आणि अन्य नुकसानीचा समावेश केला जाणार आहे.
>> प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्याची प्रत ही विमा कंपनीसाठी वापरता येणार आहे.
>> वीज पुरवठ्याबाबतचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे.
>> खेड शिवापुर दर्गा येथून वाहून गेलेल्या आणि बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह एनडीआरएफ पथकाने आज संध्याकाळी शोधून काढला.
पुणे जिल्ह्यात आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषद घेऊन पूरपरिस्थितीची माहिती देत झालेल्या नुकसानीचीही माहिती दिली. पुण्यात उद्यापासूनच पंचनामे सुरू करण्यात येणार आहे. पंचनाम्यासाठी पन्नास कुटुंबासाठी एक पथक राहणार आहे. प्रत्येक पथकात महापालिकेचे तीन अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी असणार आहेत. पंचनामे पूर्ण होताच निधीचा वाटप करण्यात येणार असून शहरी भागात पूरग्रस्तांना १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचंही राम यांनी सांगितलं. मदतीचे वाटप करण्यासाठी आचारसंहितेचा अडसर येणार नाही. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन निधी दिला जाणार आहे. फक्त धोरणात्मक निर्णय घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.
>> ग्रामीण भागात खेडशिवापूर भागात सर्वाधिक नुकसान झाले आहे. शहरामध्ये तांगेवाली कॉलनी भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे.
>> नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामध्ये टीव्ही, वाहने आणि अन्य नुकसानीचा समावेश केला जाणार आहे.
>> प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या पंचनाम्याची प्रत ही विमा कंपनीसाठी वापरता येणार आहे.
>> वीज पुरवठ्याबाबतचा आढावा घेण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांची उद्या बैठक आयोजित करण्यात आली आहे.
>> खेड शिवापुर दर्गा येथून वाहून गेलेल्या आणि बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह एनडीआरएफ पथकाने आज संध्याकाळी शोधून काढला.