म. टा. प्रतिनिधी, पुणे
‘जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी भारताला सध्या सर्वोत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतात सध्या मोठी क्षमता आहे. अमेरिका ही जगातील मोजक्या श्रीमंत व्यक्तींसाठी आंत्रप्रेन्युअर्स इंजिन होती. आता मात्र, भारत हा जगातील उर्वरित सहा अब्ज व्यक्तींसाठी आंत्रप्रेन्युअर्स इंजिन बनेल,’ असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी व्यक्त केला.
पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसीतर्फे आयोजित ‘इट्स इंडियाज टर्न नाऊ’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, एमसीसीआयचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबाने आदी या वेळी उपस्थित होते. पीआयसीच्या ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील धोरण पत्रिकेचे अनावरणही सिन्हा यांच्या हस्ते झाले.
‘भारताला सध्या लोकसंख्येचे वरदान (डेमोग्राफिक डिव्हिडंड) लाभले आहे. त्याचबरोबर देशात तीस वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार सत्तेवर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सर्वोत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतात एका पक्षाचे बहुमत आल्याने विकासाला चालना मिळाली आहे. या आधी मायबाप सरकार अशी सरकारची प्रतिमा होती. मोदी सरकारने मात्र, ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स’ हे सूत्र अंगिकारले आहे,’ असेही सिन्हा म्हणाले.
वाहतूक कोंडीचा अनुभव
‘पुण्यातील वाहतूक कोंडीबद्दल मी खूप काही ऐकून होतो. आज, मी एका अपघातासह त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पुण्यातील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. बेंगळुरूमधील वाहतूक कोंडी सर्वांत जास्त असते. पुण्याची वाटचालही त्या दिशेने होत आहे,’ असे जयंत सिन्हा म्हणाले. मात्र, आपल्या भाषणात त्यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामांचे नाते विकासाशी जोडले. विकासकामे सुरू असल्यानेच वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगताच खसखस पिकली.
सिन्हा यांच्या गाडीला अपघात
या कार्यक्रमासाठी जयंत सिन्हा येत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास रेंजहिल्स चौकात सिग्नल लागल्यामुळे त्यांची कार सिग्नलवर उभी होती. तर, त्यांच्या कारमागे अभिजीत बल्लाण (रा. पुणे) यांची होंडा सिटी कार उभी होती. त्या वेळी पाठीमागून आलेला कारचालक विनोदकुमार सुरेंद्रसिंग याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याने बल्लाण यांच्या कारला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, बल्लाळ यांची होंडा सिटी कार पुढे उभा असणाऱ्या जयंत सिन्हा यांच्या कारवर जाऊन आदळली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात तीन कारचे किरकोळ नुकसान झाले. जोरदार धक्क्याने सिन्हा गाडीच्या डॅशबोर्डवर आदळले. मात्र, तेथून ते तातडीने कार्यक्रमस्थळी रवाना झाले.
‘जागतिक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी भारताला सध्या सर्वोत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतात सध्या मोठी क्षमता आहे. अमेरिका ही जगातील मोजक्या श्रीमंत व्यक्तींसाठी आंत्रप्रेन्युअर्स इंजिन होती. आता मात्र, भारत हा जगातील उर्वरित सहा अब्ज व्यक्तींसाठी आंत्रप्रेन्युअर्स इंजिन बनेल,’ असा विश्वास केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सोमवारी व्यक्त केला.
पुणे इंटरनॅशनल सेंटर अर्थात पीआयसीतर्फे आयोजित ‘इट्स इंडियाज टर्न नाऊ’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. पीआयसीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, एमसीसीआयचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, पीआयसीचे मानद संचालक प्रशांत गिरबाने आदी या वेळी उपस्थित होते. पीआयसीच्या ‘मेक इन इंडिया’ या विषयावरील धोरण पत्रिकेचे अनावरणही सिन्हा यांच्या हस्ते झाले.
‘भारताला सध्या लोकसंख्येचे वरदान (डेमोग्राफिक डिव्हिडंड) लाभले आहे. त्याचबरोबर देशात तीस वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार सत्तेवर आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सर्वोत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतात एका पक्षाचे बहुमत आल्याने विकासाला चालना मिळाली आहे. या आधी मायबाप सरकार अशी सरकारची प्रतिमा होती. मोदी सरकारने मात्र, ‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्सिमम गव्हर्नन्स’ हे सूत्र अंगिकारले आहे,’ असेही सिन्हा म्हणाले.
वाहतूक कोंडीचा अनुभव
‘पुण्यातील वाहतूक कोंडीबद्दल मी खूप काही ऐकून होतो. आज, मी एका अपघातासह त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. पुण्यातील वाहतूक समस्या बिकट होत चालली आहे. बेंगळुरूमधील वाहतूक कोंडी सर्वांत जास्त असते. पुण्याची वाटचालही त्या दिशेने होत आहे,’ असे जयंत सिन्हा म्हणाले. मात्र, आपल्या भाषणात त्यांनी रस्त्यावर सुरू असलेल्या कामांचे नाते विकासाशी जोडले. विकासकामे सुरू असल्यानेच वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सांगताच खसखस पिकली.
सिन्हा यांच्या गाडीला अपघात
या कार्यक्रमासाठी जयंत सिन्हा येत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास रेंजहिल्स चौकात सिग्नल लागल्यामुळे त्यांची कार सिग्नलवर उभी होती. तर, त्यांच्या कारमागे अभिजीत बल्लाण (रा. पुणे) यांची होंडा सिटी कार उभी होती. त्या वेळी पाठीमागून आलेला कारचालक विनोदकुमार सुरेंद्रसिंग याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याने बल्लाण यांच्या कारला पाठीमागून जोरात धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, बल्लाळ यांची होंडा सिटी कार पुढे उभा असणाऱ्या जयंत सिन्हा यांच्या कारवर जाऊन आदळली. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. मात्र, यात तीन कारचे किरकोळ नुकसान झाले. जोरदार धक्क्याने सिन्हा गाडीच्या डॅशबोर्डवर आदळले. मात्र, तेथून ते तातडीने कार्यक्रमस्थळी रवाना झाले.