‘जीवन अक्षय’ महिनाअखेरीस बंद
व्याजदर घटविल्याचा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) व्याजदर घटविल्याचा सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) हजारो गुंतवणूकदारांना फटका बसणार आहे. आयुष्यभरासाठी विशिष्ट व्याजदराची हमी देणारी ‘जीवन अक्षय’ योजना बंद होणार असून दिवाळीनंतर नवी योजना सुरू होणार आहे. मात्र, नव्या योजनेचा व्याजदर कमी राहणार आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेली योजना बंद होणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करावेत, अशी मागणी करण्यात येत होती. नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्याजदर घटविण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे सगळीकडेच व्याजदर घसरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या धोरणाचे काही चांगले परिणाम दिसण्याची शक्यता असली, तरी ‘एलआयसी’ला मात्र त्याचा फटका बसणार आहे. ‘एलआयसी’ ची जीवन अक्षय ही आयुष्यभर ठराविक दराने व्याज देणारी योजना त्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या महिन्याअखेरीस ही योजना बंद होणार असून दिवाळीनंतर नवी योजना जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सध्या साडेसात टक्के दराने व्याज मिळते. मात्र, नव्या योजनेमध्ये इतके व्याज मिळणार नाही, त्यामध्ये एका टक्क्याने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दशकांपर्यंतच्या काळात सातत्यपूर्ण व्याजदराने परताव्याचे आकर्षण असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय होती. एकट्या पुणे व परिसरात या योजनेत १५१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, तर देशभरात तब्बल सहा हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतविले होते. बँकेच्या मुदत ठेवी किंवा अन्यत्र प्रदीर्घ काळासाठी मिळत नसलेली व्याजदराची हमी या योजनेत मिळत होती. काही काळापूर्वी एका वर्षी गुंतविण्यात आलेल्या रकमांवर तर तब्बल १२ टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. मात्र, घटत्या व्याजदरांमुळे अशा पद्धतीने आयुष्यभर व्याजदराची हमी देणे ‘एलआयसी’ला परवडेनासे झाले आहे. त्याचा फटका या योजनेस बसणार आहे.त्याबरोबरच घटत्या व्याजदरांच्या ट्रेंडमुळे सरकारही पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (एनएससी) आणि रिकरिंग खात्यांच्या व्याजदरांचाही वेळोवेळी आढावा घेऊ लागले आहे. त्यापाठोपाठ ही योजनाही बंद होत असल्यामुळे निवृत्तीनंतर एकत्र रक्कम गुंतवून दीर्घ काळापर्यंत निश्चित व्याज मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांपुढील आणखी एक पर्याय नाहीसा होणार आहे.
व्याजदर घटविल्याचा परिणाम
म. टा. प्रतिनिधी, पुणे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) व्याजदर घटविल्याचा सार्वजनिक क्षेत्रातील आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) हजारो गुंतवणूकदारांना फटका बसणार आहे. आयुष्यभरासाठी विशिष्ट व्याजदराची हमी देणारी ‘जीवन अक्षय’ योजना बंद होणार असून दिवाळीनंतर नवी योजना सुरू होणार आहे. मात्र, नव्या योजनेचा व्याजदर कमी राहणार आहे. सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय असलेली योजना बंद होणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँकेने व्याजदर कमी करावेत, अशी मागणी करण्यात येत होती. नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी व्याजदर घटविण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे सगळीकडेच व्याजदर घसरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या धोरणाचे काही चांगले परिणाम दिसण्याची शक्यता असली, तरी ‘एलआयसी’ला मात्र त्याचा फटका बसणार आहे. ‘एलआयसी’ ची जीवन अक्षय ही आयुष्यभर ठराविक दराने व्याज देणारी योजना त्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या महिन्याअखेरीस ही योजना बंद होणार असून दिवाळीनंतर नवी योजना जाहीर करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये सध्या साडेसात टक्के दराने व्याज मिळते. मात्र, नव्या योजनेमध्ये इतके व्याज मिळणार नाही, त्यामध्ये एका टक्क्याने घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दशकांपर्यंतच्या काळात सातत्यपूर्ण व्याजदराने परताव्याचे आकर्षण असलेल्या गुंतवणूकदारांमध्ये ही योजना प्रचंड लोकप्रिय होती. एकट्या पुणे व परिसरात या योजनेत १५१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती, तर देशभरात तब्बल सहा हजार कोटी रुपये गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतविले होते. बँकेच्या मुदत ठेवी किंवा अन्यत्र प्रदीर्घ काळासाठी मिळत नसलेली व्याजदराची हमी या योजनेत मिळत होती. काही काळापूर्वी एका वर्षी गुंतविण्यात आलेल्या रकमांवर तर तब्बल १२ टक्क्यांहून अधिक व्याज मिळत आहे. मात्र, घटत्या व्याजदरांमुळे अशा पद्धतीने आयुष्यभर व्याजदराची हमी देणे ‘एलआयसी’ला परवडेनासे झाले आहे. त्याचा फटका या योजनेस बसणार आहे.त्याबरोबरच घटत्या व्याजदरांच्या ट्रेंडमुळे सरकारही पीपीएफ, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स (एनएससी) आणि रिकरिंग खात्यांच्या व्याजदरांचाही वेळोवेळी आढावा घेऊ लागले आहे. त्यापाठोपाठ ही योजनाही बंद होत असल्यामुळे निवृत्तीनंतर एकत्र रक्कम गुंतवून दीर्घ काळापर्यंत निश्चित व्याज मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांपुढील आणखी एक पर्याय नाहीसा होणार आहे.