पिंपरी : माजी विरोधीपक्ष नेते कैलास कदम आणि गीता सुशील मंचरकर या पूर्वी काँग्रेस पक्षात असताना एकाच पॅनलमधून निवडून आल्या होत्या. मात्र, कालांतराने अॅड. सुशील मंचरकर माजी नगरसेवक कैलास कदम, सदगुरू कदम यांचे वाद होऊ लागले. यातून खुनाचे प्रयत्न, खुनाच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यानंतर आता कदम यांच्या खुनाचा कट उघड झाल्याने शहरातील राजकीय तसेच गुन्हेगारी जगतातील वातावरण ढवळून निघाले आहे.
उपायुक्त पंकज डहाणे यांनी याबाबत माहिती दिली. कदम व मंचरकर गटातून अनेकदा खराळवाडी आणि परिसरात हाणामाऱ्या देखील झाल्या होत्या. त्यातून परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली होती. खुनाचा प्रयत्नासह अन्य गुन्ह्यांची नोंद झाल्यावर अॅड. मंचरकरची १४ डिसेंबर २०१५ पर्यंत येरवडा जेल रवानगी करण्यात आली होती. तेथे पूर्वी ओळख असलेला सराईत गुन्हेगार संतोष जगताप हा देखील एका गुन्ह्यासाठी जेलमध्ये भेटला. तेव्हाच कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचण्यात आला.
संतोष जगतापसह सराईत गुन्हेगार काल्या आणि संतोष ऊर्फ लुब्या चांदीलकर (रा. लवळे, मुळशी) हा देखील जेलमध्येच होता. कदम यांना मारण्यासाठी या तिघांना जेलमधून बाहेर काढणे आवश्यक होते. जामीन आणि इतर प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने तिघांनाही जेलमधून पळवून लावणे हा पर्याय होता. या तिघांवर विविध जिल्ह्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. याच दरम्यान सातारा येथे या तिघांविरोधातील एका केसची सुनावणी सुरू झाली. त्यासाठी तिघांनाही सातारा कोर्टात हजर करण्यात येत होते. पाच वेळा या तिघांना तेथे नेण्यात आले. पाचव्यांना त्यांना कोर्टातून परतत असताना पोलिसांच्या सहकार्यानेच पळवून लावण्याचा बेत शिजला.
कात्रज घाटात लघवीला थांबल्यानंतर तिघेही पोलिसांना धक्का देऊन पळून गेले, असा कांगावा करण्यात आला. तसा गुन्हा देखील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या मदतीनेच हे तिघे कात्रज नाही तर मोरवाडी कोर्टाजवळून पळून गेल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी उघड केले. त्यामुळे हा तपास पिंपरी पोलिस आणि नंतर गुन्हेशाखा युनिट चारकडे सोपविण्यात आला होता. पोलिस मुख्यालयातून आरोपींना जेल ते कोर्ट व परत जेल अशी ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरूनच हा सर्व कट रचला होता. त्यासाठी राजस्थानमधून दोन सीमकार्डही खरेदी करण्यात आले होते.
खासगी वाहनातून प्रवास
तिघा सराईतांना कात्रज घाट ते मोरवाडी या दरम्यान एका खासगी कारमधून आणण्यात आले होते. तसेच मोरवाडी येथून कुटुंबीयांना भेटल्यावर काही वेळ थांबून परत जायचे असेही पोलिसांना या तिघांनी भासवले होते. मात्र, पोलिसांपैकी एका पोलिसाला हे मोरवाडीतूनच पळून जाणार असल्याचे माहित होते. कात्रज घाटात सरकारी गाडी थांबवून ज्या कारमधून तिघांना मोरवाडीत आणले गेले ती कार कोणाची याचा तपासही आता सुरू झाला आहे.
उपायुक्त पंकज डहाणे यांनी याबाबत माहिती दिली. कदम व मंचरकर गटातून अनेकदा खराळवाडी आणि परिसरात हाणामाऱ्या देखील झाल्या होत्या. त्यातून परस्पर विरोधी गुन्ह्यांची नोंदही करण्यात आली होती. खुनाचा प्रयत्नासह अन्य गुन्ह्यांची नोंद झाल्यावर अॅड. मंचरकरची १४ डिसेंबर २०१५ पर्यंत येरवडा जेल रवानगी करण्यात आली होती. तेथे पूर्वी ओळख असलेला सराईत गुन्हेगार संतोष जगताप हा देखील एका गुन्ह्यासाठी जेलमध्ये भेटला. तेव्हाच कैलास कदम यांच्या खुनाचा कट रचण्यात आला.
संतोष जगतापसह सराईत गुन्हेगार काल्या आणि संतोष ऊर्फ लुब्या चांदीलकर (रा. लवळे, मुळशी) हा देखील जेलमध्येच होता. कदम यांना मारण्यासाठी या तिघांना जेलमधून बाहेर काढणे आवश्यक होते. जामीन आणि इतर प्रक्रियेला वेळ लागणार असल्याने तिघांनाही जेलमधून पळवून लावणे हा पर्याय होता. या तिघांवर विविध जिल्ह्यांत गुन्ह्यांची नोंद आहे. याच दरम्यान सातारा येथे या तिघांविरोधातील एका केसची सुनावणी सुरू झाली. त्यासाठी तिघांनाही सातारा कोर्टात हजर करण्यात येत होते. पाच वेळा या तिघांना तेथे नेण्यात आले. पाचव्यांना त्यांना कोर्टातून परतत असताना पोलिसांच्या सहकार्यानेच पळवून लावण्याचा बेत शिजला.
कात्रज घाटात लघवीला थांबल्यानंतर तिघेही पोलिसांना धक्का देऊन पळून गेले, असा कांगावा करण्यात आला. तसा गुन्हा देखील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला. मात्र, पोलिसांच्या मदतीनेच हे तिघे कात्रज नाही तर मोरवाडी कोर्टाजवळून पळून गेल्याचे भारती विद्यापीठ पोलिसांनी उघड केले. त्यामुळे हा तपास पिंपरी पोलिस आणि नंतर गुन्हेशाखा युनिट चारकडे सोपविण्यात आला होता. पोलिस मुख्यालयातून आरोपींना जेल ते कोर्ट व परत जेल अशी ने-आण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरूनच हा सर्व कट रचला होता. त्यासाठी राजस्थानमधून दोन सीमकार्डही खरेदी करण्यात आले होते.
खासगी वाहनातून प्रवास
तिघा सराईतांना कात्रज घाट ते मोरवाडी या दरम्यान एका खासगी कारमधून आणण्यात आले होते. तसेच मोरवाडी येथून कुटुंबीयांना भेटल्यावर काही वेळ थांबून परत जायचे असेही पोलिसांना या तिघांनी भासवले होते. मात्र, पोलिसांपैकी एका पोलिसाला हे मोरवाडीतूनच पळून जाणार असल्याचे माहित होते. कात्रज घाटात सरकारी गाडी थांबवून ज्या कारमधून तिघांना मोरवाडीत आणले गेले ती कार कोणाची याचा तपासही आता सुरू झाला आहे.