म. टा. प्रतिनिधी, पुणे
पूरग्रस्तांना मदत करण्यावरून व्हॉट्सअॅपवरील पोस्टमधून टीका केल्याने पलूस (जि. सांगली) येथील टोळक्याने कोथरूडमध्ये येऊन युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर पोलिसांचे पथक 'लाड सरकार' या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांच्या धरपकडीसाठी सांगली येथे गेले आहे.
आदित्य उर्फ अतुल उत्तम लाड (वय २२, रा. कोथरूड) याने या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुरुप्रसाद दिलीप लाड, जगदीश निवास लाड, सूरज संजय लाड, संदीप लाड, आशुतोष जयवंत लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) या सर्वांवर अपहरण, मारहाण आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अतुल हा सध्या पौड रस्ता भागातील मोरे श्रमिक वसाहतीत राहतो. तो मूळचा पलूसमधील कुंडल गावातील रहिवासी आहे. तेथे 'लाड सरकार' व 'एल ग्रुप' असे असे दोन व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. 'पुरात अडकलेल्यांना स्थानिक आमदार डॉ. विश्वजित कदम मदत करत होते. तेव्हा बाकीचे लाडोबा कुठे गेले? स्वत:चे लाड करायला गेले होते का,' अशा आशयाचा मजकूर या ग्रुपवर पोस्ट केला होता. त्यानंतर गुरुप्रसाद, जगदीश, सूरज, संदीप, आशुतोष मोटारीतून पहाटे पुण्यात आले. त्यांनी अतुलच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. 'तू बदनामी करणारा मेसेज का पाठविला,' अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी अतुलला घरातून बोलवून घेत पहाटे साडेचारच्या सुमारास पौड रस्त्यावर नेले. तेथे त्याला रबरी ट्यूबने बेदम मारहाण केली. माराहाणीत अतुलचे कपडे फाटले. 'गावात येऊन आमच्या पाया पडून माफी मागयाची नाही, नाही तर तुला मारून टाकू,' अशी धमकी देऊन सर्व आरोपी मोटारीतून पसार झाले.
पूरग्रस्तांना मदत करण्यावरून व्हॉट्सअॅपवरील पोस्टमधून टीका केल्याने पलूस (जि. सांगली) येथील टोळक्याने कोथरूडमध्ये येऊन युवकाचे अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर पोलिसांचे पथक 'लाड सरकार' या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील सदस्यांच्या धरपकडीसाठी सांगली येथे गेले आहे.
आदित्य उर्फ अतुल उत्तम लाड (वय २२, रा. कोथरूड) याने या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुरुप्रसाद दिलीप लाड, जगदीश निवास लाड, सूरज संजय लाड, संदीप लाड, आशुतोष जयवंत लाड (सर्व रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) या सर्वांवर अपहरण, मारहाण आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अतुल हा सध्या पौड रस्ता भागातील मोरे श्रमिक वसाहतीत राहतो. तो मूळचा पलूसमधील कुंडल गावातील रहिवासी आहे. तेथे 'लाड सरकार' व 'एल ग्रुप' असे असे दोन व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत. 'पुरात अडकलेल्यांना स्थानिक आमदार डॉ. विश्वजित कदम मदत करत होते. तेव्हा बाकीचे लाडोबा कुठे गेले? स्वत:चे लाड करायला गेले होते का,' अशा आशयाचा मजकूर या ग्रुपवर पोस्ट केला होता. त्यानंतर गुरुप्रसाद, जगदीश, सूरज, संदीप, आशुतोष मोटारीतून पहाटे पुण्यात आले. त्यांनी अतुलच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. 'तू बदनामी करणारा मेसेज का पाठविला,' अशी विचारणा त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी अतुलला घरातून बोलवून घेत पहाटे साडेचारच्या सुमारास पौड रस्त्यावर नेले. तेथे त्याला रबरी ट्यूबने बेदम मारहाण केली. माराहाणीत अतुलचे कपडे फाटले. 'गावात येऊन आमच्या पाया पडून माफी मागयाची नाही, नाही तर तुला मारून टाकू,' अशी धमकी देऊन सर्व आरोपी मोटारीतून पसार झाले.