कुंभारबावडीतील बाजारपेठेचे स्थलांतर करण्याची मागणी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॅम्पातील न्यू मोदीखान्याजवळील कुंभारबावडी येथील भाजीबाजारामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून, त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. विक्रेते ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी विक्री करत असल्याने सफाई करणे अशक्य होत असून, भाजीविक्रेत्यांना त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. त्या तक्रारींची दखल घेऊन गायकवाड यांनी भाजीबाजार स्थलांतरित करण्याची मागणी बोर्डाच्या प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात अद्याप बोर्डाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
न्यू मोदीखाना येथील कुंभारबावडी येथे भाजीविक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत विक्रीची वेळ ठरवून दिली आहे. त्या वेळेनंतरही सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत हे विक्रेते भाजीची विक्री करत असतात. त्यामुळे भाजीबाजाराची साफसफाई करण्यास आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करता येत नाही. परिणामी, सायंकाळनंतर विक्रेते घरी गेल्यावर पालेभाज्यांसह अन्य कचरा त्या ठिकाणी पडून राहतो. त्याचे दुष्परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. भाजीविक्रेत्यांमुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
‘कुंभारबावडी येथील भाजीबाजारामधील विक्रेत्यांमुळे अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थानिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच लाखो रुपये खर्च करून या भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. विक्रेत्यांना विक्रीसाठी दिलेल्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी कँटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई वेळेवर होण्यास विलंब होत आहे. कुंभारबावडी येथे विक्री करणारे व्यापारी स्थानिक नाहीत. त्यांच्यावर बोर्डातील अधिकाऱ्यांचा वचक नाही. त्यामुळे या विक्रेत्यांकडून त्या ठिकाणचा रस्ता अडवला जात आहे. परिणामी, भाजीबाजार अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे कँटोन्मेंट बोर्डाकडे केली आहे,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे सदस्य अतुल गायकवाड यांनी दिली.
भाजीबाजार नागरिकांच्या सोयीसाठी आहे. परंतु, विक्रेत्यांनीदेखील ठरलेल्या वेळेनुसारच विक्री केल्यास त्या ठिकाणी होणारा कचरा स्वच्छ करता येऊ शकतो. विक्रेत्यांनी आडमुठेपणाची भूमिका न घेता समजूतदारपणा दाखवल्यास परिसर स्वच्छ राहू शकते. तसेच स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही.
- अतुल गायकवाड, सदस्य, पुणे कँटोन्मेंट बोर्ड
म. टा. प्रतिनिधी, पुणे
कॅम्पातील न्यू मोदीखान्याजवळील कुंभारबावडी येथील भाजीबाजारामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत असून, त्यामुळे अस्वच्छता वाढत आहे. विक्रेते ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी विक्री करत असल्याने सफाई करणे अशक्य होत असून, भाजीविक्रेत्यांना त्या ठिकाणाहून अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी स्थानिक नगरसेवक अतुल गायकवाड यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या. त्या तक्रारींची दखल घेऊन गायकवाड यांनी भाजीबाजार स्थलांतरित करण्याची मागणी बोर्डाच्या प्रशासनाकडे केली आहे. या संदर्भात अद्याप बोर्डाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
न्यू मोदीखाना येथील कुंभारबावडी येथे भाजीविक्रेत्यांना सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत विक्रीची वेळ ठरवून दिली आहे. त्या वेळेनंतरही सायंकाळी चार ते पाच वाजेपर्यंत हे विक्रेते भाजीची विक्री करत असतात. त्यामुळे भाजीबाजाराची साफसफाई करण्यास आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना सफाई करता येत नाही. परिणामी, सायंकाळनंतर विक्रेते घरी गेल्यावर पालेभाज्यांसह अन्य कचरा त्या ठिकाणी पडून राहतो. त्याचे दुष्परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. भाजीविक्रेत्यांमुळे या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
‘कुंभारबावडी येथील भाजीबाजारामधील विक्रेत्यांमुळे अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधी या नात्याने स्थानिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच लाखो रुपये खर्च करून या भागात सिमेंटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. विक्रेत्यांना विक्रीसाठी दिलेल्या वेळा पाळल्या जात नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी कँटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून साफसफाई वेळेवर होण्यास विलंब होत आहे. कुंभारबावडी येथे विक्री करणारे व्यापारी स्थानिक नाहीत. त्यांच्यावर बोर्डातील अधिकाऱ्यांचा वचक नाही. त्यामुळे या विक्रेत्यांकडून त्या ठिकाणचा रस्ता अडवला जात आहे. परिणामी, भाजीबाजार अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावा, अशी मागणी पत्राद्वारे कँटोन्मेंट बोर्डाकडे केली आहे,’ अशी माहिती पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे सदस्य अतुल गायकवाड यांनी दिली.
भाजीबाजार नागरिकांच्या सोयीसाठी आहे. परंतु, विक्रेत्यांनीदेखील ठरलेल्या वेळेनुसारच विक्री केल्यास त्या ठिकाणी होणारा कचरा स्वच्छ करता येऊ शकतो. विक्रेत्यांनी आडमुठेपणाची भूमिका न घेता समजूतदारपणा दाखवल्यास परिसर स्वच्छ राहू शकते. तसेच स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही.
- अतुल गायकवाड, सदस्य, पुणे कँटोन्मेंट बोर्ड