लातूर : रेणापूर तालुक्यातील पळशी येथील ज्येष्ठ साहित्यीक कै. गणतपराव जाधव यांना महात्मा कबीर समता परिषद नांदेडच्यावतीने मरणोत्तर 'लातूर गौरव' व 'जीवगौरव' पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराव पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. आनंद भालेराव, मुंबई हिंदी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बलदेवसिंह चौव्हाण व स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर यांच्या उपस्थितीत झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. साहित्यीक कै. गणतपराव जाधव यांचे 'आंतरीचे हुंदके' व 'माणुसकीचा मळा' हे काव्यसंग्रह गाजलेले आहेत. त्यांनी भगतसिंग विद्यालयाचे संस्थापक सचिव व लातूर जिल्हा स्काऊट गाईडचे माजी जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
कै. गणपतराव जाधव यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार
रेणापूर तालुक्यातील पळशी येथील ज्येष्ठ साहित्यीक कै...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jul 2019, 4:00 am