चार लाख किंमतीचे कातडे जप्त
म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
आळेखिंड भागातून बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्याच्या हेतूने आलेल्यांचे मनसुबे आळेफाटा पोलिसांनी उधळून लावले. बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी काही जण आळेखिंड भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले. या कृत्यात सहभागी असलेल्या चार जणांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला. मात्र इतर तीन जण फरार झाले आहेत.
पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहीतीवरून पोलिस कर्मचारी महेश काठमोरे आणि नीलेश कारखिले यांनी बनावट ग्राहक बनून तस्करांशी संपर्क केला. आरोपींनी चार लाख रुपये किंमत देण्याची मागणी केली. बिबट्याचे कातडे जंगलात लपवलेल्या ठिकाणाहून त्यांनी काढून दाखवले. त्यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच तस्कर सावध झाले. या झटापटीत तिघे जण पळून गेले. मात्र पोलिसांनी अजय छगन केदार (वय २०, रा. रामकडे बोटा, ता. संगमनेर) याला अटक केली आहे. पळून गेलेल्यांपैकी एकाचे नाव दीपक जाधव असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तस्करी रोखण्याकडे दुर्लक्ष
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी हल्ल्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या घटनांचा प्रारंभ २००१मध्ये झाला. त्या वेळी या समस्येवर उपाययोजनांविषयी जुन्नरचे तत्कालिन उपवनसंरक्षक अशोक खडसे यांनी एक प्रस्ताव सरकारला दिला होता. या भागातील बेरोजगार तरुण बिबट्यांच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी त्यांच्या शिकारीकडे वळू शकतात. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे, त्यांनी सूचविले होते. मात्र त्याबाबत कोणतीही जरब गुन्हेगारांवर बसण्यासाठीची उपाययोजना केली गेलेली नाही.
तीन ते चार घटना
आतापर्यंत तीन ते चार वेळा बिबट्याच्या, तसेच वाघाच्या कातडीच्या तस्करीचा प्रयत्न करणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.
म. टा. वृत्तसेवा, जुन्नर
आळेखिंड भागातून बिबट्याच्या कातड्याची तस्करी करण्याच्या हेतूने आलेल्यांचे मनसुबे आळेफाटा पोलिसांनी उधळून लावले. बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी काही जण आळेखिंड भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून त्यांच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे जप्त केले. या कृत्यात सहभागी असलेल्या चार जणांपैकी एक जण पोलिसांच्या हाती लागला. मात्र इतर तीन जण फरार झाले आहेत.
पोलिस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहीतीवरून पोलिस कर्मचारी महेश काठमोरे आणि नीलेश कारखिले यांनी बनावट ग्राहक बनून तस्करांशी संपर्क केला. आरोपींनी चार लाख रुपये किंमत देण्याची मागणी केली. बिबट्याचे कातडे जंगलात लपवलेल्या ठिकाणाहून त्यांनी काढून दाखवले. त्यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच तस्कर सावध झाले. या झटापटीत तिघे जण पळून गेले. मात्र पोलिसांनी अजय छगन केदार (वय २०, रा. रामकडे बोटा, ता. संगमनेर) याला अटक केली आहे. पळून गेलेल्यांपैकी एकाचे नाव दीपक जाधव असल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
तस्करी रोखण्याकडे दुर्लक्ष
जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर आणि मानवी हल्ल्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या घटनांचा प्रारंभ २००१मध्ये झाला. त्या वेळी या समस्येवर उपाययोजनांविषयी जुन्नरचे तत्कालिन उपवनसंरक्षक अशोक खडसे यांनी एक प्रस्ताव सरकारला दिला होता. या भागातील बेरोजगार तरुण बिबट्यांच्या कातड्याची तस्करी करण्यासाठी त्यांच्या शिकारीकडे वळू शकतात. त्यामुळे त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात असे, त्यांनी सूचविले होते. मात्र त्याबाबत कोणतीही जरब गुन्हेगारांवर बसण्यासाठीची उपाययोजना केली गेलेली नाही.
तीन ते चार घटना
आतापर्यंत तीन ते चार वेळा बिबट्याच्या, तसेच वाघाच्या कातडीच्या तस्करीचा प्रयत्न करणाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे या घटना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.