पुणे :
'दिल्ली की महाराष्ट्र?' या रॅपिडफायर प्रश्नावर 'दिल्ली' असं उत्तर देत महाराष्ट्र घडवण्यासाठी दिल्लीची सूत्रं हाती असायला हवीत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी करत असताना त्यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व ठरावी अशी शरद पवार यांची मुलाखत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. पुण्यातील बी. एम. सी. सी. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर २५ हजारांच्यावर प्रेक्षकांच्या गर्दीत शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगली. राज यांच्या खोचक प्रश्नांमुळे पवारांना अनेक 'राज' उलगडवून सांगावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचं गुरू-शिष्याचं नातं, नीरव मोदी प्रकरण, मराठी एकजूट, मुंबईत उसळलेल्या जातीय दंगली, मनमोहन यांचं मौन, राहुल गांधींचं भवितव्य, यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी, बाळासाहेब ठाकरेंसोबतची मैत्री आणि महाराष्ट्र व देशाचं राजकारण अशा विविध विषयांवर पवारांनी चौफेर फटकेबाजी केली.
पवारांचे 'पंच'...
> नीरव मोदीला पैसे देणारा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी नव्हता.
> राजकारणात खरं माहीत असलं तरी ते न सांगता गप्प राहण्यातच अनेकदा शहाणपण असतं.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी मला गुरू म्हणत असले तरी माझी करंगळी मी कधीही त्यांच्या हाती लागू दिली नाही.
> मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी गुजरातपेक्षा संपूर्ण देशावर लक्ष्य द्यावं.
> हा महाराष्ट्र शिवरायांचाच आहे. शाहू-फुले-आंबेडकर या तीन नावांनी महाराष्ट्राला एकसंघ ठेवलं.
> महाराष्ट्र जातीच्या मार्गाने कधीही जाणार नाही.
> मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असताना कमी बोलायचे पण निर्णय घ्यायचे.
> मोदी प्रचंड कष्ट करतात. गुजरातच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे.
'दिल्ली की महाराष्ट्र?' या रॅपिडफायर प्रश्नावर 'दिल्ली' असं उत्तर देत महाराष्ट्र घडवण्यासाठी दिल्लीची सूत्रं हाती असायला हवीत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार राष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी करत असताना त्यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली आणि महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील अभूतपूर्व ठरावी अशी शरद पवार यांची मुलाखत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. पुण्यातील बी. एम. सी. सी. महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर २५ हजारांच्यावर प्रेक्षकांच्या गर्दीत शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या प्रश्नोत्तरांची जुगलबंदी रंगली. राज यांच्या खोचक प्रश्नांमुळे पवारांना अनेक 'राज' उलगडवून सांगावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचं गुरू-शिष्याचं नातं, नीरव मोदी प्रकरण, मराठी एकजूट, मुंबईत उसळलेल्या जातीय दंगली, मनमोहन यांचं मौन, राहुल गांधींचं भवितव्य, यशवंतराव चव्हाणांच्या आठवणी, बाळासाहेब ठाकरेंसोबतची मैत्री आणि महाराष्ट्र व देशाचं राजकारण अशा विविध विषयांवर पवारांनी चौफेर फटकेबाजी केली.
पवारांचे 'पंच'...
> नीरव मोदीला पैसे देणारा आमच्या कॉलेजचा विद्यार्थी नव्हता.
> राजकारणात खरं माहीत असलं तरी ते न सांगता गप्प राहण्यातच अनेकदा शहाणपण असतं.
> पंतप्रधान नरेंद्र मोदी मला गुरू म्हणत असले तरी माझी करंगळी मी कधीही त्यांच्या हाती लागू दिली नाही.
> मोदी देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी गुजरातपेक्षा संपूर्ण देशावर लक्ष्य द्यावं.
> हा महाराष्ट्र शिवरायांचाच आहे. शाहू-फुले-आंबेडकर या तीन नावांनी महाराष्ट्राला एकसंघ ठेवलं.
> महाराष्ट्र जातीच्या मार्गाने कधीही जाणार नाही.
> मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असताना कमी बोलायचे पण निर्णय घ्यायचे.
> मोदी प्रचंड कष्ट करतात. गुजरातच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे.