म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेले वर्ष करोनाच्या सावटाखाली गेले. लॉकडाउनमुळे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली. आता कुठे गाडी रुळावर येऊ लागली होती. मात्र, पुन्हा लॉकडाउन झाल्यास आता जगणेच काय मरणेही महाग होईल, अशी प्रतिक्रिया शहरातील रिक्षाचालक, मालवाहतूकदार आणि कष्टकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाउनमुळे करोनाबाधितांच्या संख्येला अटकाव घालता येत नाही, हे जुलै महिन्यातील लॉकडाउनमध्ये अनुभवले आहे. त्या वेळी लॉकडाउनमध्ये आणि त्यानंतर रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे आता शहरात रुग्ण वाढत आहेत, त्याला अटकाव करण्यासाठी उपाययोजना निश्चित कराव्यात; पण लॉकडाउन हा उपाय नाही. लॉकडाउन केल्यास भूकबळी आणि बेरोजगारीचे बळी मोजण्याची वेळ सरकारवर येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.
वाचा: विकासाची स्पर्धा शिगेला! पुण्यात एकाच रस्त्यासाठी दोन 'वर्क ऑर्डर'
आता कुठे उत्पन्न ५०० रुपये होत आहे. इंधन खर्च, कर्जाचे हप्ते, औषधाचा खर्च यांमुळे परवडत नाही. पुन्हा लॉकडाउन केल्यास रिक्षाचालक कोलमडून पडेल. फायनान्स कंपन्या रिक्षाचालकांचे जीवन जगणे अवघड करतील, अशी प्रतिक्रिया आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी व्यक्त केली.
'लॉकडाउन कालावधीत रिक्षाचालकांचे उत्पन्न पूर्णतः थांबले होते. त्यानंतर रिक्षाचालकांना सेवा सुरू करण्याची मुभा मिळाली. मात्र, प्रवासी संख्या घटल्याने फारसे उत्पन्न मिळाले नव्हते. त्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जाचे हप्ते फेडणे अवघड झाले आहे,' असे रिक्षा फेडरेशनच्या बापू भावे यांनी सांगितले.
लॉकडाउन वाहतूकदारांच्या मुळावर
माल वाहतुकीसाठी मोठमोठी वाहने घेऊन वाहतूकदार सेवा देत आहेत. त्यासाठी मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले आहे. त्याचे हप्तेही मोठे आहेत. लॉकडाउनमुळे वाहतूकदारांना वर्षभर आर्थिक फटका बसला आहे. पुन्हा लॉकडाउन झाल्यास ते वाहतूकदारांच्या मुळावर येईल. त्यामुळे सरकारने लॉकडाउन करू नये, अशी मागणी प्रवासी व माल वाहतूकदार महासंघाच्या बाबा शिंदे यांनी केली आहे.
'कष्टकऱ्यांचे मरणच'
शहराच्या विविध भागांत मजूर अड्डे भरतात. तेथे रोजगारासाठी अनेकांना दररोज प्रतीक्षा करावी लागते. मजुरांना आता पहिल्यासारखी मागणी नाही. त्यात लॉकडाउन केला, तर उपलब्ध रोजगारही हातून जाईल, अशी कष्टकऱ्यांची भावना आहे.
वाचा: कंगनाच्या अडचणी वाढणार?; 'या' प्रकरणाचा नव्याने तपास होणार
वाचा: संजय राठोड यांच्यामुळं शिवसेनेची कोंडी; पवार, थोरात नाराज
गेले वर्ष करोनाच्या सावटाखाली गेले. लॉकडाउनमुळे संपूर्ण आर्थिक घडी विस्कटली. आता कुठे गाडी रुळावर येऊ लागली होती. मात्र, पुन्हा लॉकडाउन झाल्यास आता जगणेच काय मरणेही महाग होईल, अशी प्रतिक्रिया शहरातील रिक्षाचालक, मालवाहतूकदार आणि कष्टकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
लॉकडाउनमुळे करोनाबाधितांच्या संख्येला अटकाव घालता येत नाही, हे जुलै महिन्यातील लॉकडाउनमध्ये अनुभवले आहे. त्या वेळी लॉकडाउनमध्ये आणि त्यानंतर रुग्णसंख्या वाढली होती. त्यामुळे आता शहरात रुग्ण वाढत आहेत, त्याला अटकाव करण्यासाठी उपाययोजना निश्चित कराव्यात; पण लॉकडाउन हा उपाय नाही. लॉकडाउन केल्यास भूकबळी आणि बेरोजगारीचे बळी मोजण्याची वेळ सरकारवर येईल, असा इशाराही संघटनांनी दिला आहे.
वाचा: विकासाची स्पर्धा शिगेला! पुण्यात एकाच रस्त्यासाठी दोन 'वर्क ऑर्डर'
आता कुठे उत्पन्न ५०० रुपये होत आहे. इंधन खर्च, कर्जाचे हप्ते, औषधाचा खर्च यांमुळे परवडत नाही. पुन्हा लॉकडाउन केल्यास रिक्षाचालक कोलमडून पडेल. फायनान्स कंपन्या रिक्षाचालकांचे जीवन जगणे अवघड करतील, अशी प्रतिक्रिया आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी व्यक्त केली.
'लॉकडाउन कालावधीत रिक्षाचालकांचे उत्पन्न पूर्णतः थांबले होते. त्यानंतर रिक्षाचालकांना सेवा सुरू करण्याची मुभा मिळाली. मात्र, प्रवासी संख्या घटल्याने फारसे उत्पन्न मिळाले नव्हते. त्यामुळे उदरनिर्वाह आणि कर्जाचे हप्ते फेडणे अवघड झाले आहे,' असे रिक्षा फेडरेशनच्या बापू भावे यांनी सांगितले.
लॉकडाउन वाहतूकदारांच्या मुळावर
माल वाहतुकीसाठी मोठमोठी वाहने घेऊन वाहतूकदार सेवा देत आहेत. त्यासाठी मोठ्या रकमेचे कर्ज घ्यावे लागले आहे. त्याचे हप्तेही मोठे आहेत. लॉकडाउनमुळे वाहतूकदारांना वर्षभर आर्थिक फटका बसला आहे. पुन्हा लॉकडाउन झाल्यास ते वाहतूकदारांच्या मुळावर येईल. त्यामुळे सरकारने लॉकडाउन करू नये, अशी मागणी प्रवासी व माल वाहतूकदार महासंघाच्या बाबा शिंदे यांनी केली आहे.
'कष्टकऱ्यांचे मरणच'
शहराच्या विविध भागांत मजूर अड्डे भरतात. तेथे रोजगारासाठी अनेकांना दररोज प्रतीक्षा करावी लागते. मजुरांना आता पहिल्यासारखी मागणी नाही. त्यात लॉकडाउन केला, तर उपलब्ध रोजगारही हातून जाईल, अशी कष्टकऱ्यांची भावना आहे.
वाचा: कंगनाच्या अडचणी वाढणार?; 'या' प्रकरणाचा नव्याने तपास होणार
वाचा: संजय राठोड यांच्यामुळं शिवसेनेची कोंडी; पवार, थोरात नाराज