अ‍ॅपशहर

‘लोकमान्यां’चा वनवास सुरूच

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेला गेल्या पंधरा वर्षांपासून अज्ञातवासात राहिलेला चित्रपट प्रदर्शित करण्यास राज्य सरकारने टाळाटाळ केली आहेच; पण पंतप्रधान कार्यालयालाही याचे गांभीर्य नसल्याचे आता लक्षात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून वर्ष होत आले तरीही चित्रपट प्रदर्शनाबद्दल कोणतीही हालचाल झालेली नाही.

Maharashtra Times 31 Jul 2016, 6:07 am
रखडलेल्या चित्रपटाबद्दल ‘पीएमओ’कडूनही कार्यवाही नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम lokmanya cinema
‘लोकमान्यां’चा वनवास सुरूच


म. टा. प्रतिनिधी, पुणे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनावर आधारित असलेला गेल्या पंधरा वर्षांपासून अज्ञातवासात राहिलेला चित्रपट प्रदर्शित करण्यास राज्य सरकारने टाळाटाळ केली आहेच; पण पंतप्रधान कार्यालयालाही याचे गांभीर्य नसल्याचे आता लक्षात आले आहे. पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवून वर्ष होत आले तरीही चित्रपट प्रदर्शनाबद्दल कोणतीही हालचाल झालेली नाही.

‘भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी केंद्र सरकारने स्वातंत्र्ययुद्धातील नेत्यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याची योजना आखली होती. यामध्ये टिळकांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे काम निर्माता विनय धुमाळे यांनी स्वीकारले होते. हा चित्रपट तयार करण्यासाठी केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने २००१मध्ये त्यांना अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. याशिवाय राज्य सरकारनेही यापूर्वीच पन्नास लाख रुपये दिल्याची माहिती माहिती अधिकारातून पुढे आली आहे; पण आज सोळा वर्षे उलटली तरी चित्रपट अज्ञातवासातच राहिला आहे. या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी आम्ही सजग नागरिक मंचातर्फे गेल्या सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवले होते. त्यावर संबंधित विभागातर्फे योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे उत्तर आले. प्रत्यक्षात काहीही हालचाली झालेल्या नाहीत,’ अशी माहिती मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आणि वि. रा. कमळापूरकर यांनी दिली.

‘राज्य सरकारकडेही आमचा पाठपुरावा सुरू आहे. माहितीच्या अधिकारात केलेल्या अर्जाला सरकारने ‘या चित्रपटाची रक्कम आम्ही निर्मात्याकडून वसूल करणार आहोत,’ असे कळवले आहे. यासाठी त्यांनी स्टेट बँकेकडे जानेवारी महिन्यात ‘प्राइम लेंडिंग रेट’ची माहिती मागवली होती; पण पुढे हालचाल झालेली नाही. राज्य सरकारने पैसे निर्मात्याकडून वसूल करावेत आणि चित्रपट जनतेसमोर प्रदर्शित करावा,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज