म. टा. प्रतिनिधी, पुणे
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ४६ महिने उलटले आहेत. तर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र, त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना पकडण्यापूर्वीच प्रमुख आरोपी समीर गायकवाडला जामीन देण्यात आला. फरार आरोपींना पकडण्यात अपयश आल्यामुळेच आरोपी जामिनावर सुटले आहेत. न्यायालयाच्या निर्णय मान्य आहे. पण तपासात होत असलेल्या दिरंगाईचा जाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सरकारला विचारणार आहे. त्यासाठी २० जुलै ते २० ऑगस्ट २०१७ दरम्यान ‘जबाब दो’ आंदोलन राज्यात राबविले जाणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. सरकारच्या दिरंगाईबदद्ल महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची भेट घेऊन जाब विचारणार आहेत. संसदेच्या आणि विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून त्याची चर्चा करावी अशी मागणी या लोकप्रतिनिधींकडे अंनिसकडून करण्यात येणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून होऊन ४६ महिने उलटले आहेत. तर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला अडीच वर्षे पूर्ण झाली. मात्र, त्यांच्या सर्व मारेकऱ्यांना पकडण्यापूर्वीच प्रमुख आरोपी समीर गायकवाडला जामीन देण्यात आला. फरार आरोपींना पकडण्यात अपयश आल्यामुळेच आरोपी जामिनावर सुटले आहेत. न्यायालयाच्या निर्णय मान्य आहे. पण तपासात होत असलेल्या दिरंगाईचा जाब महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सरकारला विचारणार आहे. त्यासाठी २० जुलै ते २० ऑगस्ट २०१७ दरम्यान ‘जबाब दो’ आंदोलन राज्यात राबविले जाणार असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली. सरकारच्या दिरंगाईबदद्ल महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यातील आमदार, खासदार यांची भेट घेऊन जाब विचारणार आहेत. संसदेच्या आणि विधिमंडळ अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करून त्याची चर्चा करावी अशी मागणी या लोकप्रतिनिधींकडे अंनिसकडून करण्यात येणार आहे.