म. टा. प्रतिनिधी, पुणे 'झपाट्याने वाढते शहरीकरण आणि भूजलाच्या बेसुमार उपशामुळे देशात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. शुद्ध व पिण्यायोग्य पाण्याची उपलब्धता हे मोठे आव्हान देशापुढे उभे राहिले आहे. त्यामुळे पाण्याची बचत, साठवण आणि त्याचा परिणामकारक वापर करण्याची सवय लागली पाहिजे,' असे मत केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केले. खडकवासला येथील केंद्रीय जल अकादमी येथे आयोजित केंद्रीय जल अभियांत्रिकी सेवेतील अधिकाऱ्यांच्या ३१व्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष अरुण कुमार सिन्हा, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान विभागाचे सचिव उपेंद्र प्रसाद सिंह, राष्ट्रीय जल अकादमीचे संचालक एस. एन. पांडे, मुख्य अभियंता योगेश पैठणकर आदी या वेळी उपस्थित होते. प्रशिक्षणाचा कालावधी २४ आठवड्यांचा असून देशभरातील ४४ अधिकारी त्यामध्ये सहभागी झाले आहेत.
'पाणी बचतीची सवय लागावी'
म टा प्रतिनिधी, पुणे'झपाट्याने वाढते शहरीकरण आणि भूजलाच्या बेसुमार उपशामुळे देशात तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Aug 2019, 4:00 am