म. टा. प्रतिनिधी, पुणे
दिल्लीसह उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे देशभरातील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. पुण्याला तीन विमाने अर्धा ते एक तास उशिराने दाखल झाली, तर पुण्याहून दिल्ली व कोलकात्याला जाणाऱ्या विमानांना एक ते अडीच तास उशीर झाला. पुणे-दिल्लीचे एक विमान रद्दही करण्यात आले.
कोचीहून पुण्याला येणारे विमान पाच वाजून ३५ मिनिटांऐवजी सहा वाजून ४५ मिनिटांनी दाखल झाले. अहमदाबाद-पुणे विमान साडेपाचऐवजी २० मिनिटे उशिराने आणि दिल्ली-पुणे विमान चार वाजून ५० मिनिटांऐवजी पाच वाजून ५० मिनिटांनी दाखल झाले. पुण्याहून दिल्लीला दुपारी साडेतीन वाजता रवाना होणारे विमान रद्द करण्यात आले. पुणे-चेन्नई विमान ५८ मिनिटे उशिराने टेक ऑफ झाले. पुण्याहून बेंगळुरूमार्गे कोलकात्याला जाणारे विमान लोहगाव विमानतळ येथून ‘टेक ऑफ’ होऊन बेंगळुरूला वेळेत पोहोचले. मात्र, बेंगळुरूवरून कोलकात्यासाठी जवळपास पावणेतीन तास उशिराने विमान रवाना झाले. पुणे-जयपूर विमानदेखील दोन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने गेले. दरम्यान, लोहगाव विमानतळावर उड्डाणांना झालेल्या उशिरामुळे काही कंपन्यांनी प्रवाशांना मोफत नाश्ता दिला.
हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शेतीतील कचरा जाळल्याने आसमंतात दाटलेला धूर आणि वाढते धुरके यामुळे ही देशभरातील विमानसेवेवर परिणाम झाला आहे.
दिल्लीसह उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे देशभरातील हवाई वाहतुकीवर परिणाम झाला. पुण्याला तीन विमाने अर्धा ते एक तास उशिराने दाखल झाली, तर पुण्याहून दिल्ली व कोलकात्याला जाणाऱ्या विमानांना एक ते अडीच तास उशीर झाला. पुणे-दिल्लीचे एक विमान रद्दही करण्यात आले.
कोचीहून पुण्याला येणारे विमान पाच वाजून ३५ मिनिटांऐवजी सहा वाजून ४५ मिनिटांनी दाखल झाले. अहमदाबाद-पुणे विमान साडेपाचऐवजी २० मिनिटे उशिराने आणि दिल्ली-पुणे विमान चार वाजून ५० मिनिटांऐवजी पाच वाजून ५० मिनिटांनी दाखल झाले. पुण्याहून दिल्लीला दुपारी साडेतीन वाजता रवाना होणारे विमान रद्द करण्यात आले. पुणे-चेन्नई विमान ५८ मिनिटे उशिराने टेक ऑफ झाले. पुण्याहून बेंगळुरूमार्गे कोलकात्याला जाणारे विमान लोहगाव विमानतळ येथून ‘टेक ऑफ’ होऊन बेंगळुरूला वेळेत पोहोचले. मात्र, बेंगळुरूवरून कोलकात्यासाठी जवळपास पावणेतीन तास उशिराने विमान रवाना झाले. पुणे-जयपूर विमानदेखील दोन तासांपेक्षा अधिक वेळ उशिराने गेले. दरम्यान, लोहगाव विमानतळावर उड्डाणांना झालेल्या उशिरामुळे काही कंपन्यांनी प्रवाशांना मोफत नाश्ता दिला.
हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शेतीतील कचरा जाळल्याने आसमंतात दाटलेला धूर आणि वाढते धुरके यामुळे ही देशभरातील विमानसेवेवर परिणाम झाला आहे.