नाट्यसंमेलनाध्यक्षांच्या अभिनयसमृद्ध स्वगताने उपस्थित मंत्रमुग्ध
Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT
उस्मानाबाद : ‘पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच का वाईट...? माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या तोंडात तुळशीपत्राऐवजी दारूचे थेंब टाका. दारू पिऊ नका असे म्हणणाऱ्यांचे ऐकू नका. मला आता तरुण पिढीकडूनच आशा आहे...’ हे बोल आहेत नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांचे... हे वाचून कुणालाही धडकी भरेल, पण हे शब्द आहेत स्वगतातील... सावरकर यांनी स्वगतातून व्यासपीठावर तळीराम जिवंत केला आणि दारूबंदी, पाचशे मीटरचा निर्णय या पार्श्वभूमीवर रसिकांनी तो एका दमात रिचवला.
या एकच प्यालाचे निमित्त झाले नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या मुलाखतीचे... अमित भंडारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सावरकर यांनी मुलाखतीच्या शेवटी ‘एकच प्याला’मधील तळीराम साकारून रसिकांना अवर्णनीय अनुभूती दिली. सावरकरांच्या या वयातील ताकदीच्या अभिनयाला रसिकांची दाद न मिळती तरच नवल ! ‘राम गणेश गडकरी यांच्या नाटकांमध्ये काम केलेला मी एकमेव हयात कलाकार आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सावरकर यांनी पडद्यामागील कलाकार, कर्मचारी यापासून ते नाट्यसंमेलनाध्यक्षापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला.
‘मी उच्च शिक्षणासाठी कोकणातून मुंबईत आलो आणि नाटकाच्या धंद्याला लागलो. मी नाटकात जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न झाले. सल्ला देणाऱ्यांपाशी जीवनाची चाकोरीबद्ध चौकट होती. मी त्यात रमलो नाही. माणसाने राम व्हावे किंवा रावण व्हावे पण लोकांच्या तोंडी जरूर राहावे, हा माझा विचार होता’ या शब्दांत सावरकर यांनी एका ओळीत आपला नाट्यप्रवास उलगडला.
‘दामू केंकरे माझे एकमेव गुरू होते. बाकी अनेकांनीही शिकविले; मी मात्र केंकरेंनाच गुरू मानले. अपयशाने खचलो नाही. मी ११० नाटकांत कामे केली. प्रत्येक भूमिकेवर मनापासून प्रेम केले,’ सावरकर सांगत होते.
व्याकरणातील चिन्हांना न दिसणारा एक अर्थ आहे, जो आपण आपल्या बोलण्यातून दाखवायचा असतो. कुठे थांबायचे हे कळायला हवे. पूर्वीचे कलाकार तिरसट बोलणारे, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाल अशा विचारांचे होते. त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका करायला आजचे कलाकार धजावत नाहीत, ही खंत वाटत आहे.
- जयंत सावरकर, नाट्यसंमेलनाध्यक्ष
कलाकार होणे म्हणजे उद्याची खात्री नसलेला व्यवसाय स्वीकारणे असते. अशा परिस्थितीत कलावंत आपल आयुष्य कलेसाठी समर्पित करतो. सर्व घटकांचे मनोरंजन करतो. त्याच्या या प्रयत्नांना सरकारने सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील सर्वच मुद्दे रास्त आहेत.
-दिलीप खन्ना, एकपात्री कलावंत
जयंत सावरकर यांचे भाषण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच होते. त्यांचे भाषण भावले. त्यांनी मांडलेले मुद्दे रास्त आहेत, त्यावर विचार व्हायला हवा.
- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
जयंत सावरकर यांनी विचारलेले प्रश्न हे प्रत्येक कलावंत व निर्माते यांचे आहेत. प्रयोगाच्या ठिकाणी सुविधा नसल्याने अनेक अडचणी येतात. तसेच योग्य मानधन हा मुद्दा आहेच. अण्णांनी सर्वांच्या मनातील खदखदच व्यक्त केली आहे.
- प्रसाद कांबळी, अध्यक्ष , नाट्य निर्माता संघ
जयंत सावरकर हे नाटकाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरतात. सध्या कार्यरत असलेले ते अध्यक्ष असून त्यांचे निरीक्षण अचूक आहे. कलावंतांची पेन्शन, नाट्यगृहांची दुरावस्था अशा सर्वच प्रश्नांवर सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे
- सुनील महाजन, अध्यक्ष , नाट्य परिषद कोथरूड शाखा व निर्माता
जयंत सावरकर यांचे भाषण मनाला भिडले. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यांची फारशी माहिती नव्हती. कलाकार हा मनोरंजन करत समाजाला जागे करण्याचे काम करतो. कलावंतांना प्रतिष्ठा मिळायला हवी.
- समीर व श्रीपाद देशपांडे, नीलेश दाभाडे ( रसिक)
Chintamani.Patki@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT
उस्मानाबाद : ‘पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही, मग दारूच का वाईट...? माझा मृत्यू होईल तेव्हा माझ्या तोंडात तुळशीपत्राऐवजी दारूचे थेंब टाका. दारू पिऊ नका असे म्हणणाऱ्यांचे ऐकू नका. मला आता तरुण पिढीकडूनच आशा आहे...’ हे बोल आहेत नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांचे... हे वाचून कुणालाही धडकी भरेल, पण हे शब्द आहेत स्वगतातील... सावरकर यांनी स्वगतातून व्यासपीठावर तळीराम जिवंत केला आणि दारूबंदी, पाचशे मीटरचा निर्णय या पार्श्वभूमीवर रसिकांनी तो एका दमात रिचवला.
या एकच प्यालाचे निमित्त झाले नाट्यसंमेलनाध्यक्ष जयंत सावरकर यांच्या मुलाखतीचे... अमित भंडारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सावरकर यांनी मुलाखतीच्या शेवटी ‘एकच प्याला’मधील तळीराम साकारून रसिकांना अवर्णनीय अनुभूती दिली. सावरकरांच्या या वयातील ताकदीच्या अभिनयाला रसिकांची दाद न मिळती तरच नवल ! ‘राम गणेश गडकरी यांच्या नाटकांमध्ये काम केलेला मी एकमेव हयात कलाकार आहे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली. सावरकर यांनी पडद्यामागील कलाकार, कर्मचारी यापासून ते नाट्यसंमेलनाध्यक्षापर्यंतचा जीवन प्रवास उलगडला.
‘मी उच्च शिक्षणासाठी कोकणातून मुंबईत आलो आणि नाटकाच्या धंद्याला लागलो. मी नाटकात जाऊ नये म्हणून खूप प्रयत्न झाले. सल्ला देणाऱ्यांपाशी जीवनाची चाकोरीबद्ध चौकट होती. मी त्यात रमलो नाही. माणसाने राम व्हावे किंवा रावण व्हावे पण लोकांच्या तोंडी जरूर राहावे, हा माझा विचार होता’ या शब्दांत सावरकर यांनी एका ओळीत आपला नाट्यप्रवास उलगडला.
‘दामू केंकरे माझे एकमेव गुरू होते. बाकी अनेकांनीही शिकविले; मी मात्र केंकरेंनाच गुरू मानले. अपयशाने खचलो नाही. मी ११० नाटकांत कामे केली. प्रत्येक भूमिकेवर मनापासून प्रेम केले,’ सावरकर सांगत होते.
व्याकरणातील चिन्हांना न दिसणारा एक अर्थ आहे, जो आपण आपल्या बोलण्यातून दाखवायचा असतो. कुठे थांबायचे हे कळायला हवे. पूर्वीचे कलाकार तिरसट बोलणारे, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाल अशा विचारांचे होते. त्यांनी अजरामर केलेल्या भूमिका करायला आजचे कलाकार धजावत नाहीत, ही खंत वाटत आहे.
- जयंत सावरकर, नाट्यसंमेलनाध्यक्ष
कलाकार होणे म्हणजे उद्याची खात्री नसलेला व्यवसाय स्वीकारणे असते. अशा परिस्थितीत कलावंत आपल आयुष्य कलेसाठी समर्पित करतो. सर्व घटकांचे मनोरंजन करतो. त्याच्या या प्रयत्नांना सरकारने सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. संमेलनाध्यक्षांच्या भाषणातील सर्वच मुद्दे रास्त आहेत.
-दिलीप खन्ना, एकपात्री कलावंत
जयंत सावरकर यांचे भाषण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच होते. त्यांचे भाषण भावले. त्यांनी मांडलेले मुद्दे रास्त आहेत, त्यावर विचार व्हायला हवा.
- दीपक करंजीकर, प्रमुख कार्यवाह , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
जयंत सावरकर यांनी विचारलेले प्रश्न हे प्रत्येक कलावंत व निर्माते यांचे आहेत. प्रयोगाच्या ठिकाणी सुविधा नसल्याने अनेक अडचणी येतात. तसेच योग्य मानधन हा मुद्दा आहेच. अण्णांनी सर्वांच्या मनातील खदखदच व्यक्त केली आहे.
- प्रसाद कांबळी, अध्यक्ष , नाट्य निर्माता संघ
जयंत सावरकर हे नाटकाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी फिरतात. सध्या कार्यरत असलेले ते अध्यक्ष असून त्यांचे निरीक्षण अचूक आहे. कलावंतांची पेन्शन, नाट्यगृहांची दुरावस्था अशा सर्वच प्रश्नांवर सरकारने योग्य भूमिका घेतली पाहिजे
- सुनील महाजन, अध्यक्ष , नाट्य परिषद कोथरूड शाखा व निर्माता
जयंत सावरकर यांचे भाषण मनाला भिडले. त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यांची फारशी माहिती नव्हती. कलाकार हा मनोरंजन करत समाजाला जागे करण्याचे काम करतो. कलावंतांना प्रतिष्ठा मिळायला हवी.
- समीर व श्रीपाद देशपांडे, नीलेश दाभाडे ( रसिक)