म. टा. प्रतिनिधी, पुणे
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची निवड करण्यात आली आहे.
‘स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत संमेलन होणार आहे,’ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटन सत्रानंतर ‘चंगळवादी वृत्ती आणि पर्यावरण’ या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर ‘प्रदूषित नद्या आणि आपण’ या विषयावर परिणिता दांडेकर बोलणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर मध्यांतर होणार आहे. उत्तरार्धात अंकुश आरेकर व लता ऐवळे हे ‘रानातल्या कविता’ सादर करणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रिया चित्राव यांचा ‘हिरवाई’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण होईल. संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होणार आहे. जयंत कर्णिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या संमेलनासाठी प्रवेश विनामूल्य असून इच्छुकांना महाविद्यालय किंवा परिषदेत नावनोंदणी करता येईल.
ठरावांची अंमलबजावणी होणार
‘साहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वतःच्या जीवनशैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक -अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत. या ठरावांची अंमलबजावणी होईल,’ अशी सूचन टिप्पणी मिलिंद जोशी यांनी केली
किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुराम भाऊ महाविद्यालय यांच्यातर्फे ६ जानेवारी रोजी सातव्या पर्यावरणस्नेही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांची निवड करण्यात आली आहे.
‘स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई सभागृहात सकाळी १० ते ५ या वेळेत संमेलन होणार आहे,’ अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव उपस्थित होते.
संमेलनाचे उद्घाटन लेखक व संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार असून, उद्घाटन सत्रानंतर ‘चंगळवादी वृत्ती आणि पर्यावरण’ या विषयावर त्यांचे भाषण होणार आहे. त्यानंतर ‘प्रदूषित नद्या आणि आपण’ या विषयावर परिणिता दांडेकर बोलणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणानंतर मध्यांतर होणार आहे. उत्तरार्धात अंकुश आरेकर व लता ऐवळे हे ‘रानातल्या कविता’ सादर करणार आहेत. डॉ. सलील कुलकर्णी आणि सुप्रिया चित्राव यांचा ‘हिरवाई’ हा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर पारितोषिक वितरण होईल. संमेलनाध्यक्ष मारुती चितमपल्ली यांच्या मुलाखतीने संमेलनाचा समारोप होणार आहे. जयंत कर्णिक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. या संमेलनासाठी प्रवेश विनामूल्य असून इच्छुकांना महाविद्यालय किंवा परिषदेत नावनोंदणी करता येईल.
ठरावांची अंमलबजावणी होणार
‘साहित्य संमेलनाप्रमाणे या संमेलनात विद्यार्थी पर्यावरण रक्षणासाठीचे ठराव मांडणार आहेत. स्वतःच्या जीवनशैलीपासून ते महाविद्यालयाच्या परिसरातील पर्यावरणाबरोबरच भोवतालच्या पर्यावरणाच्या रक्षणाविषयीचे हे ठराव सूचक -अनुमोदकासह मंजूर करण्यात येणार आहेत. या ठरावांची अंमलबजावणी होईल,’ अशी सूचन टिप्पणी मिलिंद जोशी यांनी केली