अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धतीत यंदापासून बदल
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नववीचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विज्ञानाप्रमाणेच आता गणितासाठीही प्रत्येक सत्राला प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत.
गणितासाठी पूर्वीप्रमाणेच ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापन अशीच गुण विभागणी असली तरी आता फक्त चाचण्यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यार्थ्यांना मिळविता येणार नाहीत. त्यासाठी वर्षभर शिकलेल्या गणिती संकल्पना, सूत्रे यांचा व्यवहारासाठी वापर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवावा लागणार आहे. गणितासाठीही विज्ञान विषयाप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. चाचण्यांबरोबर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेही करावी लागणार आहेत. गणिताच्या दोन्ही भागांसाठी प्रात्यक्षिके राहणार आहेत.विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची प्रात्यक्षिके द्यावीत याबाबत पाठ्यपुस्तकातच नमुने दिले आहेत. त्रिकोणांची वेगवेगळी मापे घेऊन त्याच्या भौमितीक रचना करणे, औषधाच्या पकिटावरून प्रत्येक घटकाचे शतमान काढणे, एखाद्या खोलीतील सर्व वस्तूंची मापे लक्षात घेऊन प्रमाणबद्ध नकाशा काढणे, संख्यारेषेवरील दोन बिंदूमधील अंतर काढणे अशा प्रकारच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
बीजगणित, भूमितीची लेखी परीक्षा
प्रत्येक सत्रात चाचणी, प्रात्यक्षिके आणि लेखी परीक्षा मिळून गुण गृहित धरण्यात येणार आहेत. त्यानुसार बीजगणित आणि भूमिती प्रत्येकी ४० गुणांची लेखी परीक्षा असेल. दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी २० गुणांची चाचणी परीक्षा असेल. चाचणी परीक्षेच्या एकूण ४० गुणांचे १० गुणांत रुपांतर करण्यात येईल. तसेच, प्रत्येक सत्रात दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी ५ गुणांचे प्रात्यक्षिक असे एकूण १० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा राहणार आहे.
म. टा. प्रतिनिधी, पुणे
नववीचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत यंदापासून बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे विज्ञानाप्रमाणेच आता गणितासाठीही प्रत्येक सत्राला प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत.
गणितासाठी पूर्वीप्रमाणेच ८० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुण अंतर्गत मूल्यमापन अशीच गुण विभागणी असली तरी आता फक्त चाचण्यांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापनाचे गुण विद्यार्थ्यांना मिळविता येणार नाहीत. त्यासाठी वर्षभर शिकलेल्या गणिती संकल्पना, सूत्रे यांचा व्यवहारासाठी वापर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष करून दाखवावा लागणार आहे. गणितासाठीही विज्ञान विषयाप्रमाणेच प्रात्यक्षिक परीक्षा सुरू करण्यात आल्या आहेत. चाचण्यांबरोबर विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकेही करावी लागणार आहेत. गणिताच्या दोन्ही भागांसाठी प्रात्यक्षिके राहणार आहेत.विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची प्रात्यक्षिके द्यावीत याबाबत पाठ्यपुस्तकातच नमुने दिले आहेत. त्रिकोणांची वेगवेगळी मापे घेऊन त्याच्या भौमितीक रचना करणे, औषधाच्या पकिटावरून प्रत्येक घटकाचे शतमान काढणे, एखाद्या खोलीतील सर्व वस्तूंची मापे लक्षात घेऊन प्रमाणबद्ध नकाशा काढणे, संख्यारेषेवरील दोन बिंदूमधील अंतर काढणे अशा प्रकारच्या प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.
बीजगणित, भूमितीची लेखी परीक्षा
प्रत्येक सत्रात चाचणी, प्रात्यक्षिके आणि लेखी परीक्षा मिळून गुण गृहित धरण्यात येणार आहेत. त्यानुसार बीजगणित आणि भूमिती प्रत्येकी ४० गुणांची लेखी परीक्षा असेल. दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी २० गुणांची चाचणी परीक्षा असेल. चाचणी परीक्षेच्या एकूण ४० गुणांचे १० गुणांत रुपांतर करण्यात येईल. तसेच, प्रत्येक सत्रात दोन्ही विषयांसाठी प्रत्येकी ५ गुणांचे प्रात्यक्षिक असे एकूण १० गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा राहणार आहे.